Saturday 28 March 2015

Spring is THE Season...


It is so amazing how the same place looks so different when you visit it at different times of the year.Taljai tekdi is no exception. It looks so dry & barren during the winter. The trees shed their leaves. Dry, yellowish brown leaves are scattered all over the place. The dry, leafless branches of the trees, bushes & shrubs appear like big thorns stacked up by somebody. Even the birds lie low & silent. The winter, though not so chilling, casts its spell nevertheless.
Late in the month of February & early March, the scenes change slowly, but distinctly. Suddenly out of nowhere small, green leaves start appearing on these dry shrubs. Their colour is very peculiar- just as you can make out even from a far distance,  a building getting a fresh & new coat of paint, you can see this fresh green colour. At times the contrast of  fresh green as compared to the dark green or yellow colour of the leaves of  older trees is striking. The entire road that is lined on both sides with these trees, gets a new look. It is as if somebody has changed the sets in a play or in the film. There is a nice & cool breeze blowing. The rains on previous day add another distinct flavour to the fragrance. A typical smell of wet leaves adds to the beauty of the experience that you can have through all your senses.
On one fine day you notice these beautiful Palaash or Palas (botanical name- Butea monosperma, also called Flame of the forest ) flowers. Here too the contrast in the background of the dry, brown coloured shrubs is remarkable. 
Palas
  


And then you realize that there are patches in the area which have this tree in predominance. What a view it would be if someone could take aerial photos of these flamboyant trees! 
Pangara

Palaash, Katesavar (or Bombax malabaricum or Silk cotton tree) & Pangara (or Erythrina indica or Indian coral tree) are probably the early messengers signalling the end of winter & beginning of Spring or Vasant Rutu.



Kate savar




I think so as to announce the arrival of spring as far as they can, these trees are studded with bright coloured flowers & virtually no leaves.As if taking cue from these messengers, suddenly there is lot of bustling activity, restless enthusiasm all around. The silence of the winter is soon a thing of the past. The birds shed all their boredom & soon there are calls of all sorts  from all directions. The forced break to their voices has worked wonders it seems.
You hear  the carefree, happy-go-lucky whistle of oriental Magpie Robin first & then you locate it somewhere on the tree top. This bird with its shiny, black & white looks,  is singing merrily & uninhibitedly. The whistle of an Iora is somewhat different. It is as if some college going youth is calling his friend (not necessarily a girl friend!) & asking to come out in the window.
The arrival of Spring has made some birds really bold. Those who would otherwise prefer to be camouflaged & only to be heard than seen, also venture out in the open. Coppersmith Barbet is the case in point. Here is he coming out of hiding, sitting perched on a horizontal branch of a tree. He is using it like a dais & giving us,the captive audience, an incessant & repetitive speech of his calls! 


Coppersmith Barbet
Photo courtesy- Vivek Joshi

These days we are seeing many birds that we hadn't seen  before. May be we were not coming here often during this time of the year or may be we were not keenly observing them. But better late than never, it is indeed a treat to your eyes & ears to see such wonderful birds. And I am not even considering peacocks here. We have been rewarded with sightings of Minivets & our favourite Paradise flycatchers on a regular basis.
Paradise Flycatcher
Photo courtesy -Vivek Joshi

Another bird to be seen usually is the spotted owlet. It is remarkable that we see the bird around the same spot whenever we go there.  It is seen around this dilapidated structure-either on the roof or on one of the branches of the Neem tree. 





This empty, broken structure is actually fit for shooting of a horror movie. The owlet would only add to the scary atmosphere!
A surprise sight these days is that of Common hawk Cuckoo or Brain fever bird or Pavsha in Marathi. I thought usually it is seen/ heard in the month of May, when the rainy season is just round the corner. In fact it gets its Marathi name because of  that. But I was wrong. I checked to find that it is seen in hot weather. Its call is fantastic.Its call could be interpreted as - perte vha...perte vha.... It as if tells the farmers to start preparing the farmland for the crops as rains could just be round the corner. But the English name of Brain fever is simply not fair. It means the calls are irritating. We have never imagined that this bird can be irritating.  Can the calls be electrifying? You can hear  from so far away & this call draws you towards the bird. It is that mesmerizing! The bird has obliged us not just with its calls but we have also been able to see it for a pretty long time. For a bird not even bigger than a pigeon, the calls are really of high frequency. These calls make me nostalgic & takes me back to the jungles of Dandeli when we had heard them for the first time. Those calls still ring in my ears! Funnily enough,the Koel, not wanting to be left behind, also joins the party.

The exuberance, the extravagance & the flamboyance seen or heard everywhere is not without a purpose.The Spring has in store immense possibilities. It is a season of not just rejuvenation but also regrowth & regeneration.The Spring ushers in breeding season for many birds. All this fuss by the birds- their calls & their appearances-is about getting noticed. So all the eligible candidates for this year are in a hurry to prove their worthiness & be the Chosen One! 

Wednesday 25 March 2015

अनौपचारिक गप्पा : डॉ. आनंद आणि श्री. अमृत बंग यांच्याशी ….



'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' ला जाणं हा नेहमीच आनंददायक अनुभव असतो. माझी मामी सौ. लीना देवस्थळी हिचा ध्यास असलेला हा वृद्धाश्रम आमच्यासाठीही एक अभिमानाची गोष्ट आहे. खोपोली-पाली रस्त्यावर,पुणे आणि मुंबईपासून  १०० किमी अंतरावर जांभूळपाडा या शांत गावी हा वृद्धाश्रम एका बैठ्या वाडयाच्या स्वरूपात वसला आहे. सर्वसाधारणपणे वृद्धाश्रम म्हटलं की एक नकारात्मक चित्र डोळ्यापुढे येतं. पण इथे तसं नाही. इथल्या निवासी आणि कर्मचारी यांचं एकमेकांशी खेळीमेळीचं नातं आहे.एक छान आपलेपणा आणि उत्साही वातावरण  इथे  नेहमीच जाणवतं. 'चैतन्य' चा तिसरा वर्धापनदिन नुकताच, १५ मार्च २०१५ ला, एका सुंदर समारंभाद्वारे साजरा करण्यात आला. मुंबई येथील दीप्ती ठाकूरदेसाई आणि त्यांच्या शिष्यांचा कथक नृत्याचा बहारदार कार्यक्रम, पुण्याचे (निवृत्त )एअर मार्शल भूषण गोखले यांचे युद्धभूमीवरचे स्वानुभवकथन असा कार्यक्रम होता. तसेच  डॉ.अभय आणि डॉ. राणी बंग यांचे सुपुत्र डॉ.आनंद आणि श्री.अमृत बंग यांच्या मुलाखतीचाही कार्यक्रम होता. ही मुलाखत सौ. लीना देवस्थळी व मी घेतली. 





डॉ.बंग दाम्पत्याचे कार्य अफाट आहेच पण त्यांच्या दोन्ही मुलांनीही गडचिरोली मध्येच काम करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याची केवळ एक झलक त्यांच्याशी बोलताना मिळाली. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचाही साधेपणा ! कुठलाही बडेजाव नाही, कसलाही इगो नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय हा मोठेपणा मिरवण्याचा प्रयत्न नाही ! त्यांच्या एकूणच वागण्यात सहजता होती. मुलाखातीआधीही  दोघांशी संवाद साधणं सोपं गेलं. आम्ही जणू एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होतो अशाप्रकारे दोघेही बोलले. कार्यक्रम खूप छान झाला याचे श्रेय त्या दोघांचे ! दोघांच्याही बोलण्यात आत्मविश्वास तर होताच पण ते जे काही बोलत होते ते अगदी मनापासून होतं. त्यांचं काम, त्यांचे तिथले अनुभव बोलण्यातून अगदी सहजपणे व्यक्त होत होते. त्यांच्या विचारांत कमालीची  clarity होती. कुठलाही गोंधळ नव्हता. म्हणूनच त्यांचं बोलणं appealing होतं. त्यांनी प्रेक्षकांशी अनौपचारिक संवाद तर साधलाच पण कार्यक्रमानंतरही  प्रत्येकाशी ते न कंटाळता बोलत होते. माणसं थोडी जरी मोठी झाली तरी आपल्याभोवती ते एक कवच निर्माण करतात, जे  भेदता येत नाही. पण हे दोघेही त्याला नक्कीच अपवाद होते.

मुलाखतीची काही क्षणचित्रे -

गडचिरोलीची दुर्गमता, तिथले हवामान याबद्दलची माहिती असेलच. पण डॉ.आनंद यांनी तिथल्या आरोग्य विषयक समस्यांविषयी सविस्तरपणे सांगितलं. गडचिरोलीची लोकसंख्या महाराष्ट्राच्या १% इतकीच आहे. परंतु तिथे मलेरियाचे प्रमाण बघितले तर महाराष्ट्रातल्या २५ टक्के केसेस तिथे सापडतात. एवढेच नव्हे तर नोव्हेंबर २०१४ या एका महिन्यात तिथे मलेरियाचे  तब्बल १२००० रुग्ण सापडले! शिवाय तिथे मलेरियाचा घातक प्रकार (Falciparum) आढळतो, ज्यात मेंदूवर परिणाम होतो. ( हे माझे मत-आणि आपण इथे स्वाइन फ्लू मुळे घाबरून जातो, मीडिया देखील स्वाइन फ्लूचा बाऊ करते. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आणि प्राणघातक आजार आहेत. पण त्यांचा आपण तेव्हढ्या प्रमाणात विचार करत नाही.) 

डॉ.आनंद बंग

                                                                ******
गडचिरोलीमध्ये बालमृत्यू दर घटवण्याचे महत्त्वपूर्ण काम बंग दाम्पत्याने केले आहे. पूर्वी तिथे हा दर, दर हजारी १२१ इतका होता. त्यापैकी ४०% बाळं न्यूमोनियामुळे दगावत. या परिस्थितीचा बंग दाम्पत्याने अभ्यास केला. आजाराचे योग्य निदान आणि वेळीच उपचार न झाल्यामुळे असे होत होते असा निष्कर्ष त्यांनी काढला. या अभ्यासाला त्यांनी जोड दिली संशोधनाची ! या समस्येवर उत्तर तर शोधणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी तिथल्याच लोकांना प्रशिक्षित केले.त्यांनी तयार केलेले हे आरोग्यदूत घरोघरी जावून आजारी मुलांचा श्वास घेण्याचा वेग एका सोप्या श्वास -मापकाच्या आधारे घेत. जर हा वेग ५०-६० प्रति मिनिट इतका आढळला तर तिथेच त्या बाळाला न्यूमोनिया  आहे असं निदान करून त्यावरची प्रतिजैविके (antibiotics) देत. अशा प्रकारे ५ वर्षे ही पद्धत राबवल्यानंतर न्यूमोनियामुळे बाळं दगावण्याचे प्रमाण फक्त ०.५% इतकेच उरले. ही अतिशय सोपी आणि कमी खर्चाची पद्धत इतर राज्यांत आणि इतर अनेक देशातही राबवली गेली. या संशोधनाला 'Lancet' या वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मासिकातही स्थान मिळाले.
आपल्या गडचिरोली आणि इतर मागास भागांकडे बघण्याच्या शहरी मानसिकतेबद्दल(म्हणजे आपल्या अनास्थेबद्दल) डॉ.आनंद यांनी खलील जिब्रानचे एक अतिशय भिडणारे वाक्य सांगितले - संपूर्ण झाडाची  मूक संमती असल्याशिवाय त्याचे एकही पान गळू शकत नाही ! तसंच गडचिरोलीचं आहे- इथे बालमृत्यू किंवा ही कोवळी पानगळ होत आहे कारण त्याला उर्वरित महाराष्ट्राची जणू मूक संमतीच आहे. 

                                                               ******
आपल्या लहानपणाविषयी, त्यावेळेच्या घरातल्या वातावरणाविषयी दोघेही मनमोकळेपणाने बोलले.


डॉ.राणी बंग  दिवसातले १८ तास काम करून घरी आल्यावर घरचेही सगळे बघत आणि रात्री-अपरात्री कोणी बोलवलं तरी जात. काही वेळा पेशंटला रक्त देण्याची गरज भासली तर स्वत: रक्त देउन मग त्या पेशंटची शस्त्रक्रिया करत. गडचिरोली मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिझेरियन ऑपरेशन डॉ. राणी बंग यांनी केले. घरात वातावरण हे असे सेवेचे, दारू मुक्ती आंदोलनातील बंग परिवाराच्या सक्रिय सहभागामुळे चळवळीचे होते. दारू मुक्तीच्या आंदोलनाच्या काळात तर बंग दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 
अशा परिस्थितीतदेखील डॉ. राणी बंग रात्री-अपरात्री पेशंट बघण्यासाठी गावोगावी जात.डॉ. राणी बंग या अतिशय निर्भीड आणि संवेदनशील तर डॉ. अभय बंग हे rational, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे, संशोधक मनोवृत्तीचे perfectionist आहेत असे डॉ. आनंद यांनी सांगितले. 
घरात प्रत्येकाला मत स्वातंत्र्य असून आपापले मत मांडणे आणि त्यावर मोकळी चर्चा करणे हे नेहमी होते असे दोघेही म्हणाले. करिअरची निवड आणि आयुष्याच्या जोडीदाराची निवड याही बाबतीत दोघांनाही पूर्ण स्वातंत्र्य होते. 

                                                                    ******

अमृत बंग हे इयत्ता पहिली ते दहावी शाळेत गेलेच नाहीत. म्हणजे त्यांनी शाळेतल्या सर्व परीक्षा दिल्या आणि त्यात नेहमीच ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. पण शाळा न करण्याची सवलत तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. हल्लीच्या काळात केव्हा मूल  दीड वर्षाचं होईल आणि केव्हा शाळेत जावू लागेल याची पालकांना घाई आणि चिंता लागलेली असते. त्या तुलनेत हे शाळेत न जाणं, कुठलाही क्लास न लावणं अगदी उठून दिसतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पालकांनी त्यांचा कधीही अभ्यास घेतला नाही की कधी कुठला धडा शिकवला नाही. फक्त कुठे अडलं तर ते सांगत असत. घरात मात्र वाचण्याचं बरंच साहित्य उपलब्ध असे. शिवाय विज्ञानाच्या प्रयोगांसाठी छोटी प्रयोगशाळाही होती. 

                                                                       ******
अमृत पुण्याच्या PICT कॉलेज मधून इंजिनियर झाले. त्या काळात डॉ. अभय बंग यांनी एकदा त्यांना पैशाचे महत्त्व किती हे फार सुंदररीत्या सांगितले होते. ते म्हणाले होते- पैशाचे महत्त्व पायातल्या चपले इतके ! चप्पल पायात नसेल तर पायाला दगड वगैरे टोचतील, पाय भाजतील. म्हणून चप्पल हवी. पण आपण ती कधी गळ्यात घालत नाही. तसंच पैशांचं आहे.कदाचित म्हणूनच असेल की अमृत यांनी सॉफ्टवेअर कंपनीतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि आता ते गडचिरोली मध्ये कार्यरत आहेत. 

श्री. अमृत बंग 

                                                                       ****** 
MKCL (Maharashtra Knowledge Corporation Ltd ) च्या वतीने १८-२८ या वयोगटातील तरुणांना सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी  प्रशिक्षण देण्यासाठी 'निर्माण' हा  एक उपक्रम राबवला जातो. त्याचे समन्वयक म्हणून अमृत काम पाहत आहेत. आजवर सुमारे ६०० तरुणांनी ' निर्माण' मध्ये  प्रशिक्षण घेतले असून सुमारे १०० जण  पूर्णवेळ वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक कार्यात आहेत.हे प्रशिक्षण ३ टप्प्यात असते. जानेवारी, जून आणि डिसेंबर अशा वर्षातील ३ महिन्यांत प्रत्येकी ८ दिवसांचे शिबीर गडचिरोलीमध्ये घेण्यात येतं.ज्यांना आयुष्यात पुढे काय करायचं आहे याचा ठाम निर्णय घेता येत नाहीये, त्यांनी स्वतः लाच स्वतः ची ओळख होण्यासाठी आणि ज्यांना सामजिक  कामात रस आहे अशांनी यात जरूर सहभागी व्हावे असे मी सुचवेन. 

                                                                        ******
कार्यक्रम संपल्यावर मनात वेगवेगळ्या भावना होता. एकीकडे एक विलक्षण भारलेपण, भारावलेपण होते. आपण काहीतरी अद्भुत, अविस्मरणीय अनुभवले आहे आणि एका वेगळ्याच अनुभवाचे आपण एक साक्षीदार झालो याचा आनंद होता. पण तरीही दुसरीकडे कुठेतरी एक बोच होती. म्हणूनच नकळत डोळ्यांत पाणी आले. इंग्रजीत ज्याला आपण 'Missed the bus' म्हणतो तसं काहीसं वाटलं. पहिल्यांदाच असे प्रकर्षानं  जाणवलं की आपण या कामात आता सहभागी होवू शकत नाही. वय उलटून गेल्याची जाणीव या आधी इतकी  कधी झाली  नव्हती  ! 

 ( 'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' चे काही फोटो) -

' चैतन्य' चे प्रवेशद्वार 



बैठ्या वाड्याचे स्वरूप 


निवासींची खोली 

भोजनकक्ष 


'चैतन्य' विषयी अधिक माहितीसाठी ही वेबसाईट पहावी-
www.chaitanyasahniwas.com

डॉ अभय बंग यांच्या कार्याविषयी जाणून घ्यायचे असल्यास इथे पाहावे-
www.searchgadchiroli.org

'निर्माण' संबंधी माहिती इथे मिळेल -
http://nirman.mkcl.org 


Thursday 5 March 2015

' देवाघर'ची फुले



आज इथे लहान मुलांचा मस्त कल्ला चालू आहे.मुलं त्यांच्या शाळेतून परत आली आहेत. म्हणूनच असेल कदाचित की ती जास्त खुश आहेत. ना कसलं बंधन, ना कुठली शिस्त ! आरडाओरडा, चालताना बूट जोरजोरात आपटणे वगैरे प्रकार सुरू आहेत.शार्दुल त्याने शाळेत रंगवलेले चित्र एखाद्या मानपत्रासारखे सगळ्यांना दाखवत फिरतोय.  मी जिथे बसलोय त्या खोलीत शंतनू मिस्कीलपणे डोकावून बघतोय. हा इतर मुलांपेक्षा त्यांच्या खोलीत आधी आलाय. बेफिकीरीने असं दप्तर भिरकावून तो खोलीबाहेर पडलाय  देखील ! मग त्याला एक खोडी सुचली आहे. इतर मुलं आत असताना या पठ्ठयाने त्या खोलीचे दार बाहेरून लावून घेतले आहे आणि आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात तो तिथून निघूनही  गेलाय. मग इतर मुलांचा एकच गलका ! त्यांच्या त्या दार उघडण्यासाठीच्या विनवण्या ! कुणीतरी दार उघडून त्यांची सुटका केली आहे ! 
आता मला ही मुलं दिसत नाहीत पण त्यांचं  सर्व बोलणं स्पष्टपणे ऐकू येतंय. सगळीकडे कसलीतरी लगबग सुरू आहे. "दिदी, मला पण गंध लाव" असं कोणीतरी म्हणतंय. रोजच्या वेळेप्रमाणे बहुदा आता ही मुलं जेवणाच्या गोल टेबलाभोवती बसली असणार. "आज जेवायला काय आहे ? " असा कुठल्याशा मुलाचा प्रश्न ! "आज होळी आहे ना ? म्हणून आज पुरणपोळी आणि भजी आहेत" असं कोणीतरी उत्तर दिलंय. "चला सगळ्यांनी वदनी कवळ घेता म्हणा" असं ती दिदी सांगते आहे. 
बटन ऑन केल्यावर लगेच गाणे लागावे अशा त्वरेने मुलं म्हणू लागली आहेत-

वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे 
सहज हवन होते नाम घेता फ़ुआचे 

सगळी मुलं एकत्र म्हणत नाहीयेत. जो उशीरा येईल तो नव्याने चालू करतोय. पण कोणीही 'फुकाचे' म्हणतच नाहीये- 
फ़ुआचे किंवा फुटाचे वा फुलाचे असंच चाललंय. 
मग ' जे जे रघुवीर समर्प' असं म्हणून गाडी पुढे जात आहे. 
Thank you God for the world so sweet… इथे thank जरा जास्तच लांबवला जातोय. खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी याच क्रमाने आणि अशाच प्रकारे गेली अनेक वर्षे अनुभवल्या आहेत. पण का कोण जाणे आज मला या thank you … मध्ये एकाच वेळी विरोधाभास (Irony) आणि निरागसता प्रकर्षाने जाणवते आहे. या मुलांनी त्या परमेश्वराचे आभार कशासाठी मानायचे ? या निष्पाप मुलांवर त्यांच्या आई- वडिलांशिवाय राहायची वेळ आणू दिल्याबद्दल?आणि या मुलांना कळतही नाहीये की ज्या जगातल्या त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडलंय (नाईलाजास्तव असो की अन्य कुठल्या कारणांनी ) त्याच जगाला ते sweet असं म्हणतायत. 

माझं काम संपवून मी बाहेर येतो  तर मला मुलांची जेवणाची गोलमेज परिषद भरलेली दिसतेय. मगाचचा तो दंगा अजिबात नाहीये. मुलं अगदी तल्लीन होऊन जेवतायेत. हे दृश्य मात्र फारच आश्वासक आहे.
त्यातला  एक मुलगा  समजून उमजून की प्रतिक्षिप्त क्रियेने, ते माहित नाही, पण मला टाटा करतोय.