Tuesday 26 December 2017

वाढदिवसाच्या शुभेच्छा संजीव फडतरे !


(या प्रसंगातील व्यक्ती खऱ्या आहेत परंतु प्रसंग काल्पनिक आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही)

संजीव फडतरे
हे आहे 'ABP न्यूज नेटवर्क' आणि तुम्ही पाहात आहात 'ABP माझा'... उघडा डोळे बघा नीट... 

अश्विन बापट(थंडीत आपण आपले हात एकमेकांवर घासतो तसं घासत) : नमस्कार! मी अश्विन बापट... सकाळच्या सातच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. एक नजर आताच्या मुख्य घडामोडींकडे.. बघूया हेडलाईन्स... 
राजीव खांडेकर(मुख्य संपादक)(त्यांच्या नाकातल्या आवाजात अश्विन बापटांना मध्येच तोडतात ): अरे... अश्विन... हेडलाईन्सकडे वळण्याआधी पुण्याहून एक आगळीवेगळी बातमी येत आहे.तर आपण आता आपल्या पुण्याच्या वार्ताहराकडे थेट जाऊया... बघूया काय ब्रेकिंग न्यूज आहे... 
आता स्क्रीनवर पुण्याचे  रिपोर्टर मंदार गोंजारी दिसतात... अतिशय उत्साहात आणि तार 
स्वरात बोलतात.. 
मंदार गोंजारी: अश्विन आणि राजीव सर... पुणेकर जे आहेत ते नेहमीच टिंगलीचा विषय बनतात. मग त्यांच्या स्वभावाचा विषय असेल किंवा पुणेरी पाट्या असतील... पण आज मी तुम्हांला पुणेकरांचं एक एकदम वेगळं रूप दाखवणार आहे... मी आत्ता उभा आहे पुण्यातील कल्पक सोसायटीमध्ये... आणि जर कॅमेरा पॅन केला तर तुम्हांला इथल्या माहोलचा अंदाज येईल... (कॅमेरा सगळीकडे फिरतो) तर आता तुम्ही पाहताय की पुण्याच्या सकाळच्या थंडीतसुद्धा इथे केवढी गर्दी जमली आहे. पण गर्दी असली तरी गोंधळ नाहीये...लोकं छान रांगेत उभी आहेत... रांग खूप लांबपर्यंत गेलेली आहे.  सगळे जे आहेत ते एकदम आनंदात दिसत आहेत...लोकं आहेत ती ग्रुप जो आहे तो करून उभी आहेत... प्रत्येक ग्रुपच्या हातात फ्लेक्सचे बॅनर आहेत... त्यावर त्या ग्रुपचं नाव दिसतंय... त्या ग्रुपचा लोगो दिसतोय... तर आता आपण यातल्या काही लोकांशी बोलूया... हा पहिला ग्रुप... यातल्या फ्लेक्स बॅनरवर लिहिलंय- 'कटारिया हाफ चडडी १९८५ तर्फे संजीवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !' या ग्रुप मध्ये सुमारे ५० लोकं दिसतायत. प्रत्येकाकडे काही ना काही प्रेझेंट आहे. कोणाच्या हातात केक जो आहे तो दिसतोय तर कोणाकडे बुके... कोणाकडे डिकॅथलॉन मधल्या स्पोर्ट ऍक्सेसरीज.. कोण आहेत संजीव? ही एवढी गर्दी त्यांच्यासाठी का जमली आहे? ते आता आपण जाणून घेऊया. बोलूया या कटारिया ग्रुप मधल्याच एका मित्राशी... 
मंदार गोंजारी: तुमचं नाव?
राजेश मेहता: राजेश मेहता 
मंदार गोंजारी: आज इकडे हे सगळं काय आहे? तुम्ही सगळे इथे कशासाठी जमला आहात?
राजेश मेहता( त्याच्या सॉफ्ट आवाजात) : आम्ही सगळे संजीवचे शाळेतले मित्र आहोत आणि(थोडंसं त्रासिकपणे- रिपोर्टरला वाचताही येत नाही का असे भाव चेहऱ्यावर !)आम्ही का जमलो आहोत ते या बॅनरवर लिहिलं आहे... आज आमचा सगळ्यांचा जिवलग मित्र संजीव फडतरे याचा वाढदिवस आहे. आमच्या प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी आमच्या पाठीशी असणारा, चेष्टा-मस्करी करणारा पण नेहमीच मैत्रीला मानणारा, जपणारा असा आमचा हा मित्र ! त्याला शुभेच्छा द्यायला आम्ही जमलोय. फक्त आम्हीच नाही तर आमच्या शाळेतले सर- जोशी सर, घाणेकर सर हे पण आलेले आहेत... एवढंच नाही तर आजच्या वाढदिवसासाठी दुबईवरून आमचा मित्र अतुल ओझा आणि कॅनडावरून यतीन पेंढारकरही आलेले आहेत... 
(कटारिया मधले सगळे मित्र- 3 Cheers for Sanjeev... Hip Hip Hurray... असं म्हणून आसमंत दणाणून सोडतात.) 
मंदार गोंजारी: तर तुम्ही बघितलं की श्री संजीव फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सगळे किती उत्साहाने इथे आले आहेत. कटारियाच्या या ग्रुपच्या मागे अनेक ग्रुप्स आहेत- इथे Whistling Wilds आहे... Life Begins after 40s आहे... ट्रेकिंगचा ग्रुप आह ... प्रत्येक जण श्री फडतरे यांना शुभेच्छा द्यायला आलेला आहे. पुढे Diamond Watch Co चे लोक आहेत त्यांच्या मागे अखिल तुळशीबाग व्यापारी संघटनेचे लोक आहेत... त्यांच्यामागे अखिल पुणे व्यापारी संघटनेचे लोकं आहेत... कितीतरी क्रीडासंघटनेचे ग्रुप्स आहेत... एखाद्या राजकारण्याला लाजवेल इतका जनसंपर्क श्री संजीव फडतरे यांचा दिसतोय... (अचानक लगबग वाढते. गलका होतो) राजकारण्यांचं नाव घेताच इथे दस्तुरखुद्द पुण्याचे पालकमंत्री आलेले आहेत. (मंदार धावत धावत त्यांच्याकडे  जातात  आणि दमछाक झालेल्या आवाजातच त्यांना विचारतात)
मंदार गोंजारी: हे सगळं... वातावरण... बघून तुम्हांला नेमकं काय ... वाटतंय?
पालकमंत्री:सर्वप्रथम...(छोटा pause) आज...(मोठा pause) याठिकाणी .... मी माननीय श्री संजीवरावजी फडतरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो... इथली गर्दी... इथे जमलेला जनसमुदाय बघून खरं तर मला श्री फडतरे साहेबांचा हेवाच वाटतोय... किती वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं इथे जमली आहेत... ते ही उत्स्फूर्तपणे... केवढ्या प्रेमाने इथे आले आहेत सगळे.. त्यांचा जनसंपर्क किती मोठा आहे... नाहीतर आम्हांला आमच्या सभांसाठी लोकांना किती कष्ट घेऊन बोलवावं लागतं आणि तरीही लोकं येतील याची काही खात्री देता येत नाही!(मिष्किलपणे हसतात !)  आज या निमित्ताने मी श्री फडतरे साहेबांना विनंती करतो की त्यांच्या मागे एवढे समर्थक आहेत तर त्यांनी सक्रिय राजकारणात यावं ... त्यांच्यासारख्या चांगल्या लोकांची आम्हांला नेहमीच गरज असते. असंही २०१९ आता फार लांब नाही... पुण्यात विधानसभेसाठी त्यांनी विचार करायला काहीच हरकत नाही... अर्थात हे माझं वैयक्तिक.... 
मंदार गोंजारी:( पालकमंत्र्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत बोलणं सुरु करतात. पालकमंत्री अवाक!आणि अर्थातच फ्रेमच्या बाहेर!): तर अश्विन, इथे मी एक ब्रेकिंग न्यूज देऊ शकतो... जी फक्त ABP माझा कडेच तुम्ही बघू शकताय... पुण्याच्या पालकमंत्र्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार नक्की केलाय... 
अश्विन बापट(स्टुडिओमधून) : नक्कीच मंदार ही एक मोठी बातमी आहे  आजची... त्यावर आपण दिवसभर चर्चा करणारच आहोत... खरं तर एक ब्रेक घेण्याची वेळ केव्हाच होऊन गेली आहे पण आपण एक अतिशय वेगळी अशी बातमी बघतोय... एक आगळावेगळा वाढदिवस सोहळा याचि देहि याची डोळा पाहतोय... तेव्हा ब्रेक न घेता आपण असाच कार्यक्रम सुरु ठेवूया... मंदार तू इतका वेळ आमच्याशी बोलतोयस... तुझ्यामागे मला काही मांडव दिसतायत..खाण्याचे स्टॉल दिसतायत. तिथे नेमकं काय चाललंय? 
मंदार गोंजारी: हो अश्विन... बरोबर आहे तुझं... हे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत. मला असं कळलंय की श्री संजीव फडतरे फूडी आहेत. ते नेहमीच नवनवीन हॉटेल्समध्ये जात असतात. आणि त्यांची हॉटेल मालकांबरोबर छान मैत्रीही आहे. म्हणूनच आज सगळ्या हॉटेल्सनी इथे स्टॉल्स टाकले आहेत. 'नागब्रम्हा', 'अण्णाज इडली' इथून दाक्षिणात्य पदार्थ, 'सुशील'चे पोहे, विजय टॉकीजजवळचा पिठलं वडापाव, पुण्यातल्या सर्व नामवंत मिसळी इथपासून ते निलेश थोरपे यांचा 'अहिल्याज थाळी' या मांसाहारी पदार्थांचा स्टॉलही इथे आहे. कोणीही या आणि कितीही खा असा आजचा कार्यक्रम आहे ! आणि हे सगळे आपणहून आलेले आहेत श्री फडतरे यांना शुभेच्छा द्यायला... 
अश्विन बापट: मंदार... तू म्हणतोयस सगळे शुभेच्छा द्यायला आलेले आहेत... पण ज्यांचा आज वाढदिवस आहे.. म्हणजेच आजची उत्सवमूर्ती आहे तरी कुठे? 
मंदार गोंजारी: अश्विन... मी सुद्धा खूप प्रयत्न करतोय श्री. फडतरे साहेबांपर्यंत पोचण्याचा...  पण या गर्दीमुळे मला काही ते जमत नाहीये...आता शेवटचा प्रयत्न करून बघतो...
(मग कॅमेरामनसह धावत धावत संजीवच्या घरी गर्दीतून वाट काढत जातात. घरी नमन आणि ऋतुजा फोनवरून लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. तर सपना आलेल्या लोकांशी बोलत असते)
मंदार गोंजारी (सपनाशी बोलतात) : नमस्कार... मी 'ABP माझा' चा रिपोर्टर.. मला श्री. संजीव फडतरेंना भेटायचं आहे.. त्यांचं अभिनंदन करायचं आहे... मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलंय... आता प्रत्यक्ष भेटायचंय... बोलवा ना त्यांना... कुठे आतल्या रूममध्ये आहेत का ते? 
सपना: कोण.... संजू? संजू इथे नाहीये... 
मंदार गोंजारी(प्रचंड धक्का बसलेल्या आवाजात): काय? ते इथे नाहीत? मग कुठे आहेत?
सपना:आज एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे याचा त्याला कालच अंदाज आला होता. अशा गोष्टींमुळे तो अगदी संकोचतो. म्हणून तो आणि त्याचे काही मित्र  काल रात्रीच  पुण्याबाहेर गेले आहेत पक्षीनिरीक्षण आणि फोटोग्राफीसाठी... कुठे गेले आहेत हे खरं तर मला माहित आहे. पण मी तुम्हांला सांगणार नाही.... नाही तर तुम्ही लोक तिकडेही जाल त्याच्यामागे... 
मंदार गोंजारी(आवाजात थोडी निराशा)ज्या व्यक्तीचा असा वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा होतोय ती व्यक्ती मात्र पुण्याबाहेर गेलेली आहे. एक हुरहूर लावणारी ही गोष्ट आहे...तर मी मंदार गोंजारी तुम्हांला आता 'ABP माझा'च्या स्टुडिओकडे परत नेतोय...
अश्विन बापट: धन्यवाद मंदार... तुझ्या या सविस्तर रिपोर्टींग बद्दल! खरंच श्री. फडतरे यांच्याशी आपल्याला बोलायला मिळालं असतं तर नक्कीच ते सर्व प्रेक्षकांना आवडलं असतं... पण पुन्हा कधीतरी ! आता मात्र खरोखरच ब्रेक घेऊया... तुम्ही कुठेही जाऊ नका.. पाहत राहा फक्त 'ABP माझा'...  




Monday 25 December 2017

A Photo Blog: My trip to Saat Taal -Pangot- Uttarakhand Part 2



Apart from the smaller birds, we saw many varieties of bigger birds- all very spectacular. Here are some of them-
Blue Whistling Thrush
This Blue Whistling Thrush has a very sweet whistling call & every morning, it would be seen perched on a pole on our hotel building calling merrily...
Red billed Blue Magpie
This bird has such a long tail- almost reminiscent of Paradise Flycatcher... But it is a very aggressive bird with a very different call...
Black Francolin- male

Black Francolin- female
Oriental Turtle Doves
Bronzed Drongo

 
Grey Tree pie 
 
Black headed Jay

We saw 4 types of Woodpeckers- the Brown fronted Woodpecker, Grey headed Woodpecker, Lesser Yellow naped Woodpecker & Rufous bellied Woodpecker( the last one we saw at Pangot). Of the 4, the Brown fronted Woodpecker was v commonly seen & it gave us such wonderful poses that I might have clicked its 400-500 photos! It was one of the most still & stable birds. Here it is-

Brown fronted Woodpecker
Another beauty that we saw was a bird from the Pheasant family- the Kalij Pheasant-
Kalij Pheasant- male 


Kalij Pheasant-male & female 
We also saw two species of owls- the smallest owl (perhaps in India)- the Collared Owlet & also a pair of Brown Fish Owl...
The Collared Owlet was chased away by other birds from Himalayan Bulbul to Drongo. With the Owlet around, the birds had become very restless..
Collared Owlet 
We saw the pair of Brown Fish Owl at Chafi, Saat Taal... They were perched high up in the mountain gorge & we had to almost to a mini trek to go closer to them. But the effort was worth it... They were almost waiting for us to come so that they could pose!
Brown Fish owl






Saturday 23 December 2017

A Photo Blog: My trip to Saat Taal -Pangot- Uttarakhand Part 1

I went to Saat-Taal & Pangot for bird watching & photography from 15-19th November 2017. We must have seen about 80 species of birds. Most of them I saw for the first time. It was indeed an experience of a different kind... Here are some of the photos that I took... All photos taken on Nikon 3200 camera & 200-500 Nikkor Lens..

Black lored Tit
We saw many types of Tits. This Black lored Tit was probably the best of the lot.
Green backed Tit 
This is one more variety of Tit- the Green backed Tit. Other types that we saw were- Great Tit, Coal Tit, Bush Tit...
Chestnut bellied Nuthatch-Male
Chestnut bellied Nuthatch is a very industrious bird- never still.. always engaged in some activity. This is its typical posture...
Chestnut bellied Nuthatch- Female
The female bird of the same species is much paler than the male...
White bellied Nuthatch
We also saw White bellied Nuthatch at Pangot...
Grey Bushchat
A very bold & beautiful bird... Not shy at all... Would sit & pose for a pretty long time...
Red billed Leiothrix 
This is such a beautiful bird with such vibrant colours !
Russet Sparrow 
Another small bird.. always in pair... The Russet Sparrow
Olive backed Pipit

Himalayan Bulbul
Of the three varieties of Bulbuls that we saw(Ashy Bulbul, Black Bulbul & Himalayan Bulbul), this is the Himalayan Bulbul...
We saw 4 types of Laughing Thrushes... This is Striated Laughing Thrush

Striated Laughing Thrush
This is White Crested Laughing Thrush..
White Crested Laughing Thrush
... This is  Streaked laughing Thrush
Streaked Laughing Thrush
And the fourth variety that we saw was White Throated Laughing Thrush- coming in groups & their call justifying their name, these birds are also very active..
White Throated Laughing Thrush










                                                                                                                        (to be continued...)



Tuesday 12 December 2017

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुश्रुत आणि श्रीधर !

सुश्रुत बडवे
सुश्रुत: 'सह्याद्री'तून 'सह्याद्री'कडे जाणारा सुह्रद!(७ ऑगस्ट)
तशी मला शाळा फारशी कधीच आवडली नाही. इतरांना असतात तशा मला शाळेबद्दलच्या रम्य आठवणीही नाहीत. अलिकडे शाळेच्या एका whatsapp ग्रुपवर सलील(बर्वे)ने मला add केलं. आणि शाळेतल्या जुन्या मित्रांना ' भेटण्याची ' गंमत अनुभवायला मिळू लागली. अशाप्रकारे मला सुश्रुत बडवे  पुन्हा भेटला. एकदा तो तळजाईला प्रत्यक्षही भेटला. पक्षी निरीक्षण, जंगल या आमच्या समान आवडी! अशाच तळजाईच्या एका भेटीतून मग एकदम अचानक आमची ताडोबाची ट्रिप ठरली. त्यात संजीव(फडतरे)ही आला आणि मग अशा एकत्र ट्रिप्सचा एक सिलसिला सुरु राहिला. यातून सुश्रुतची आणखी ओळख होत गेली.
सुश्रुत एक चांगला आणि नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन आहे हे माहीत होतंच ! पण आपल्याला भेटणारा सुश्रुत आणि 'सह्याद्री' हॉस्पिटलमधला सुश्रुत ही संपूर्णपणे वेगळी व्यक्तिमत्वं आहेत. त्याचा दरारा, त्याच्याबद्दलचा भीतीयुक्त आदर याच्या आख्यायिका मी 'सह्याद्री'मध्ये काम करणाऱ्यांकडून बऱ्याच वेळा ऐकल्या आहेत. अर्थात त्याची शारीरिक ठेवण आणि देहबोलीही तशी त्या आख्यायिकांना साजेशीच आहे ! पण आपल्याला भेटतो तो एकदम मनमोकळा, हसरा, दिलखुलास आणि उत्कट सुश्रुत! तो तुमची चेष्टा-मस्करी करतो. एवढंच नाही तर तुम्हीही त्याची टिंगल टवाळी करू शकता ! याचं कारण सुश्रुत माणसांमध्ये(विशेषतः मित्रांमध्ये) रमणारा आहे.त्याची खूप जणांशी छान मैत्री आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधली किती माणसं त्याने जोडलेली आहेत हे त्याच्या क्लिनिकच्या उद्घाटनाच्या दिवशी अगदी सहज कळून येत होतं.
कित्येक लोकांचं असं होतं की आपलं काम आणि त्यातून मिळणारे पैसे याच्या रगाड्यात ते इतके अडकतात की त्यांना जगण्याच्या बाकी काही गोष्टी असतात हे एक तर माहित नसतं किंवा ते विसरून गेलेले असतात. सुश्रुतचं तसं नाही. पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्य आहे - 'पोटापाण्याचा उद्योग तुम्ही जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, संगीत, नाट्य, खेळ या पैकी एखाद्या गोष्टीशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हांला जगवेल. पण या गोष्टींशी जडलेली मैत्री तुम्हांला का जगायचं हे सांगून जाईल.' मला वाटतं सुश्रुत हे अगदी तंतोतंत जगतो. त्याचं डोंगर-दऱ्या, ट्रेकिंग, प्राणी-पक्षी आणि या सगळ्याची फोटोग्राफी यांच्याशी एक अतूट नातं आहे. त्याला याची पॅशनच आहे म्हणा ना! या सगळ्याचं त्याचं knowledge ही जबरदस्त आहे. Given a choice, तो कायमच डोंगर दऱ्यांत झोकून देऊन राहील. पण सध्या ते कदाचित जमणार नाही. म्हणून त्याने त्याचं काम आणि त्याची ही आवड यांच्यात छान समतोल साधला आहे. याबाबतीत तो एकदम sorted आहे. त्याला जशी या गोष्टींची आवड आहे तशीच ती त्याने त्याच्या मित्रांमध्येही रुजवली आहे.म्हणून तो त्याच्या मित्रांना आग्रहाने या गोष्टींसाठी बोलावतो किंवा मित्रांनी त्याला बोलावल्यास कुठलीही खळखळ न करता त्यांना जॉईन होतो.
गिरीप्रेमी लोकांची एक जीवनशैली असते. तशी ती सुश्रुतचीसुद्धा आहे. त्याच्या गरजा अगदी minimum असतात. म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर तो कुठल्याच बाबतीत फारसा आग्रही नसतो. राहण्याची सोय, खाणं-पिणं याबाबतीत तो अजिबात fussy नाही. तो सगळीकडे वेळा पाळतो. एवढंच नाही तर त्याची बायको आणि मुलगीही त्याच्याबरोबर याबाबतीत अगदी तय्यार झालेल्या आहेत.
या वेळ पाळण्यावरून आठवलं. सुश्रुतबद्दलची ही गोष्ट सांगितल्याशिवाय त्याची ओळख पूर्ण होणार नाही. जर तुम्ही सुश्रुतबरोबर विमानप्रवास करणार असाल तर ही गोष्ट तुम्हांला नक्कीच माहित असणं गरजेचं आहे. कुठेही जाण्याच्या दृष्टीने विमान गाठायचं असतं तेव्हा सुश्रुतचं एक वेगळंच रूप तुम्हांला बघायला मिळतं .विमानतळावर पोचून सेक्युरिटी चेक अप होईपर्यंत तो इतका अस्वस्थ, चिडचिडा, बेचैन असतो की काही विचारता सोय नाही! उशीर झाल्यामुळे पूर्वी कधी त्याचं विमान चुकलं होतं की काय माहित नाही ! बरं तो एकटाच अस्वस्थ झाला असता तर गोष्ट वेगळी होती! त्याच्याबरोबर तुम्हांलाच काय, तो इतर सगळ्यांनाच प्रचंड घाई करतो विमानतळावर पोचण्यासाठी ! एकदा तिथे पोचला आणि सगळे सोपस्कार झाले की मग मात्र त्याला विमानात बसण्याची कसलीच घाई नसते ! अगदी त्याच्या नावाचा पुकारा होईपर्यंतही तो एकदम निवांत राहू शकतो !
तर सुश्रुतला आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! Hope येणाऱ्या काळांत त्याच्याबरोबर आम्हांला अनेक जंगल ट्रिप्स करता येतील आणि त्यांचा आणि त्याच्या company चा आनंद घेता येईल !



वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीधर अय्यर ! (२६ ऑक्टोबर)


श्रीधर अय्यर
शाळेतले मित्र मधल्या अनेक वर्षांच्या गॅप नंतर फेसबुकवर किंवा व्हॉटस अँप वर 'भेटतात'. या अलीकडच्या ट्रेंड प्रमाणे श्रीधरही मला त्याच्या ट्रेकिंगच्या फेसबुकवरील  सुंदर पोस्टमधून भेटत होता. नंतर एक दिवस अचानक तो आणि सुवर्णा आम्हांला मुंबई- पुणे- मुंबई (भाग २) या सिनेमाच्या वेळी सिटीप्राईड सातारा रोडला भेटले. तेव्हा पुन्हा शाळेच्या जुन्या आठवणी निघाल्या. पटवर्धन मॅडमनी शिकवलेल्या 'Psalm of Life' या कवितेची आठवणही आपसूकच निघाली. नंतर आम्ही(सुश्रुत आणि संजीवसह) बांधवगढला सहकुटुंब गेलो. त्याआधी एकदा श्रीधरच्या घरीही गेलो. बांधवगढला एकत्र प्रवास केला. येताना तर रेल्वे प्रवासात आम्ही आणि श्रीधर(त्याच्या कुटुंबासह) असा बराच काळ होतो. यातून श्रीधरची थोडी थोडी ओळख झाली. 

श्रीधरने मराठी सिनेमा पाहावा यात खरं तर विशेष असं काही नाही. तो फक्त आडनावापुरता अय्यर आहे. बाकी तो पक्का मराठीच आहे. तो अस्खलित मराठी बोलतो. त्याला कितीतरी मराठी/ हिंदी गाणी, कविता, उर्दू शेर, गझल तोंडपाठ आहेत. त्याने त्याच्या क्षेत्रात करिअर केलं नसतं तर भाषेच्या क्षेत्रात त्याने नक्कीच काहीतरी केलं असतं. त्यातही त्याचं जास्त प्रेम साहेबाच्या भाषेवर आहे. किंबहुना त्याच्यात आणि इंग्रजांमध्ये जे काही साम्य आहे त्यामध्ये इंग्रजी भाषा हा एक प्रमुख मुद्दा आहे. श्रीधरची फोटोग्राफिक स्मरणशक्ती आहे . तो कुठल्याही अनुभवाचे( विशेषतः ट्रेकचे) अगदी जिवंत वर्णन करतो. याचं मुख्य कारण हेच असावं की तो सगळे अनुभव अगदी समरसून घेतो.आणि म्हणूनच त्याच्या लिखाणामधून तो आपल्याला त्या ट्रेकची म्हणा किंवा एखाद्या अनुभवाची सफर घडवतो इतकं ते लिखाण vivid असतं. त्याची इंग्रजी भाषा फक्त समृद्धच नाही तर तिला एक नर्मविनोदी, खुसखुशीत satireची जोड आहे.(हा ही साहेबाचाच गुण !) त्यामुळे त्याचं लिखाण वाचनीय होतं. त्याच्या लिखाणावरून आणखी काही गोष्टी कळतात. एक म्हणजे श्रीधर हा एक जग पाहिलेला माणूस आहे आणि दुसरं म्हणजे He seems to be a well read person! त्याच्या लिखाणातून त्याच्याबद्दल समजलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची आयुष्याची philosophy ! 'वेगवेगळे अनुभव घेऊन स्वतःला समृद्ध करा, materialistic गोष्टींमधून नाही' हे त्याचं तत्त्व तो अगदी तंतोतंत पाळतो.  

श्रीधरच्या वागण्यात एक सहजता आहे. समोरच्या माणसाला तो आपलंसं करून टाकतो आणि म्हणूनच त्याची कोणाशीही मैत्री व्हायला वेळ लागत नाही. बांधवगढहून पुण्याला येताना रेल्वे प्रवासात आमच्या बर्थसमोर एक बिहारी कपल आणि त्यांची तान्ही मुलगी होती. त्या ७-८ महिन्याच्या मुलीला श्रीधरच नाही तर सुवर्णा आणि त्यांची मुलगी श्रीया -तिघेही इतके छान खेळवत होते की काही विचारता सोय नाही ! मी हे असं कधीच करू शकलेलो नाही. याच रेल्वे प्रवासात श्रीधरने अचानक -आपण गाणी म्हणू यात का असं विचारलं. मी ढुढ्ढाचार्यासारखा गप्प होतो. श्रीधर हसत हसत सहजपणे म्हणाला- काय होईल जास्तीत जास्त? आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय परस्पर होईल !(म्हणजे आमचं गाणं ऐकून लोक पैसे टाकतील!) आणि खरंच त्याने गायला सुरुवात केली. मग मीही गाऊ लागलो आणि आम्ही प्रवास मस्त एन्जॉय केला. त्या बिहारी कपलमधल्या नवऱ्यानेही पुण्याला उतरताना आमच्या गाण्याला चक्क दाद दिली! त्याअर्थी आम्ही बरं गायलो असू ! 

श्रीधर आणि इंग्रज यांच्यात आणखी एक साम्य म्हणजे त्याचा लोकशाही या मूल्यावरचा दृढ विश्वास ! शिवाय त्याला debate करायलाही आवडतं. मी त्याच्या debating स्किल्स बद्दल खूप ऐकलं आहे(देव आहे की नाही या विषयावर खूप गरमागरम चर्चा एका ट्रेकला झाली होती म्हणे!) पण मी प्रत्यक्ष अनुभवलेलं  नाही. वादाच्या दोन्ही बाजूंकडचे मुद्दे त्याच्याकडे असतात. Whatsapp वर काही वेळा राजकीय विषयांवर वाद-विवाद होतात. तेव्हा कर्मधर्मसंयोगाने आमची एकच बाजू असते. त्यावेळी तो कुठून कुठून references आणतो आणि समोरच्याशी मुद्देसूद प्रतिवाद करतो. वातावरण थोडं तापतंय असं लक्षात आलं तर तो कुठला तरी शेर/कविता टाकून ताण एकदम हलका करून टाकतो.त्याचा सर्वसमावेशक लोकशाही आणि त्यातून साधला जाणारा विकास यावर विश्वास आहे. सध्या तो आणि मी एका बाजूला आहोत. पण मला खात्री आहे की जरी आमची बाजू बदलली(सध्या तरी ते होईल असं दिसत नाही !) तरीही आमच्यातली मैत्री कायम राहील. 

पुन्हा एकदा श्रीधरला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 

   

सिनेमा आणि आठवणी ३

सिनेमा आणि आठवणी ३
(या विषयावर बहुदा हे शेवटचंच लिखाण!)
१. आजपर्यंत फक्त एकदाच असं झालंय की एकट्याने एखादा सिनेमा पाहिला आहे. एक फुकट पास मिळाला म्हणून मला एकट्यालाच मंगला थिएटरला जाऊन पाहावा लागला. सिनेमा कुठला? तर 'खुदागवाह' ! फुकट पासमध्ये २-२ श्रीदेवी ! मग का नाही बघणार ! पण खरंच सांगतो खूप कंटाळा आला. सिनेमा भीषणच होता. पण बरोबर कोणी असतं तर कॉमेंट्स टाकून मजा आली असती. जे सिने पत्रकार एकट्याने जाऊन सिनेमे बघतात त्यांच्याबद्दल मला म्हणूनच सहानुभूती वाटते . फक्त एकट्याने कोणताही सिनेमा बघायचा एवढंच नाही तर पुढे त्यावर लिहायचं सुद्धा ! हे सोपं काम मुळीच नाही.

२. काही सिनेमे परगावी पाहिले आहेत. पहिल्या लिखाणात नाशिकचा उल्लेख आहेच. एकदा आमच्या शाळेची ट्रिप औरंगाबादला गेली होती. मला वाटतं ८३-८४ साल असेल. त्यावेळी शाळेने आम्हांला एक नाही तर चक्क २ सिनेमे तिथल्या थिएटरमध्ये नेऊन दाखवले होते ! त्यामुळे अजंठा-वेरूळ बघून झाली नसेल इतकी या सिनेमे बघण्यामुळे ट्रिप संस्मरणीय झाली ! ते सिनेमे होते अमिताभ बच्चनचा 'नमकहलाल' आणि धर्मेंद्र-हेमामालिनी यांचा 'रझिया सुलतान' ! आता हेच सिनेमे का याला काही उत्तर नाही. त्यावेळी ते तिथे थिएटर मध्ये लागले होते हेच खरं कारण !

३. मी मुंबईला खूप सिनेमे पाहिलेले आहेत. माझा मोठा मामा डोंबिवलीला, मधला गिरगावात तर धाकटा मामा (तेव्हा) पार्ल्याला राहत होते. आणि तिथे सगळीकडेच मी सिनेमे पाहिले आहेत. खुद्द मुंबईत सिनेमे बघणं हा एक अतिशय आनंदाचा भाग असायचा. गिरगाव आणि मुंबईचा तिथला परिसर मला खूप आवडतो. लहानपणी संध्याकाळच्या वेळी गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंट असे आम्ही चालतसुद्धा फिरलेलो आहोत. तो क्वीन्स नेकलेस, व्हीटी स्टेशनचा भाग, ताजमहाल हॉटेल, गेट वे ऑफ इंडिया, मलबार हिल इथे फिरणं म्हणजे धमाल होती. आयुष्यातल्या छान काळापैकी तो काळ होता. ( २००५ साली माझ्या धाकट्या मामाने त्याच्या गाडीतून आम्हांला South Bombay ची सैर घडवली होती. सगळ्या हेरिटेज बिल्डींग दाखवल्या होत्या. येताना आम्ही पेडर रोड मार्गे आलो. तेवढ्यात ' प्रभूकुंज' दिसलं. मला आपली भाबडी आशा वाटत होती की तिथले सन्माननीय निवासी आम्हांला बघून आम्हांला हात दाखवतील. असं अर्थातच काही झालं नाही!) यात आयसिंग ऑन द केक होते सिनेमे ! 
कधी 'मेट्रो' ला A view to a kill किंवा Beautiful People, कधी 'रिगल' ला 'गांधी'!
हिंदीतला 'गांधी' डोंबिवलीतील रामचंद्र थिएटर ला पाहिला होता. 'रिगल' आता बंद झालं हे ऐकून खूप हळहळ वाटली. तसंच 'स्टर्लिंग'ला Home Alone (1) पाहिला होता. तेव्हा इंटरव्हलला मामाने घेऊन दिलेलं भलं मोठं चॉकलेट आईस्क्रीम माझ्या अजूनही लक्षात आहे ! अलीकडे 'न्यू एक्सेलसिअर'ला 'हम आपके है कौन' पाहिला होता तेव्हा आमची भाचे कंपनी प्रत्येक गाण्याला थिएटर मध्ये अक्षरश: नाचली होती ! 'मराठा मंदिर' ला सिनेमा पाहिला होता की नाही हे मला आता नक्की आठवत नाही.पण पाहिला असेल असं वाटतंय पण तो शोले किंवा DDLJ नक्कीच नव्हता हे मात्र पक्कं आठवतंय ! अलीकडे मुंबईला जाणं कमी झालंय. गेलो तरी काही प्रसंगानिमित्त जाणं होतं. म्हणूनच ते वडाळ्याच्या Imax ला काही जाणं झालेलं नाही.
माझ्या मनात एक ambitious प्लॅन आहे. पुण्याहून सकाळी निघायचं. Imax ला सिनेमा बघायचा आणि दादरला पोर्तुगीज चर्चजवळ असलेल्या 'जयहिंद लंच होम' जाऊन मस्तपैकी रावस तंदूर किंवा स्टफ बोंबील वगैरे खायचं आणि संध्याकाळी पुण्याला परत !
बघूया कधी जमतंय ते !

सिनेमा आणि आठवणी २

सिनेमा आणि आठवणी २
आता आठवलं तर असं लक्षात येतंय की माझी मोठी बहीण (मुग्धा) आणि मी -आम्ही खूप सिनेमे पाहिले आहेत. आधीच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे काही तद्दन बेकार सिनेमेही पाहिले आहेत. पण यामुळेच कि काय माहीत नाही. आम्हांला प्रत्येक सिनेमात काही ना काही चांगलं दिसतंच ! आणि माझी अशी थेअरी आहे की सिनेमात काम करणाऱ्या जवळपास सगळ्या नट्या दिसायला छानच आहेत( त्याला कदाचित प्रिया राजवंश हा एकमेव अपवाद असू शकेल !) असो. थोडं विषयांतर झालं.
सिनेमे आणि ते पाहिल्याशी जोडल्या गेलेल्या आठवणींकडे पुन्हा वळतो-
१. माझ्या उभ्या आयुष्यात हे मी एकदाच अनुभवलं आहे. तुमच्या बाबतीत किती वेळा असं घडलंय ते मला जरूर सांगा. पुण्यातल्या वसंत टॉकीजमध्ये मी ऋषी कपूर- जयाप्रदाचा 'सरगम' पिक्चर पाहिला होता. आणि सिनेमात कुठलंही गाणं सुरु झालं की एक अभूतपूर्व प्रकार घडे. अचानक सगळीकडून लोकं पैसे फेकू लागत. अक्षरश: पाऊस !त्यातल्या त्यात 'डफलीवाले' या गाण्याला मला वाटतं सगळ्यांत जास्त पैसे फेकले गेले असतील. सिनेमातली गाणी आवडतात, त्यावर टाळ्या शिट्ट्या पडतात हे माहित होतं. पण पैसे पडलेले मी पहिल्यांदाच पाहिलं. या सगळ्या चिल्लर-नाण्यांचं पुढे काय झालं किंवा यात नेमकं कोण मालामाल झालं हे ही कधी कळलं नाही.

२. ऋषी कपूरच्याच आणखी एका सिनेमाची आठवण आहे. मला वाटतं ते १९८०-८१ साल असावं. माझ्या आते-बहिणीची(सौ उषाताई) मंगळागौर आमच्या घरी करण्यात आली होती. आणि त्यासाठी मी शाळेतून लवकर घरी आलो होतो... खास परवानगी काढून. आमच्या क्लास टीचरांनी अर्थातच नाखुशीनेच परवानगी दिली होती. त्यांना खरा कार्यक्रम काय होता हे कळलं असतं तर ती मला कधीही मिळू शकली नसती. आमच्या आईने मंगळागौरीचा एक वेगळाच कार्यक्रम ठेवला होता. तो म्हणजे आमच्या घरी प्रोजेक्टर वर सिनेमा दाखवण्याचा ! ती जिथे नोकरी करत होती( B J मेडिकल कॉलेज, PSM dept शी संलग्न एक NGO) तिथे श्री जहागिरदार म्हणून एक गृहस्थ होते. त्यांचं तिथे फिल्म स्क्रिनिंग करणे हेच काम होतं. त्यांच्याकडून हा सगळा योग जुळवून आणला. घरच्या हॉलच्या भिंतीवर सगळ्यांनी मिळून आम्ही 'खेल खेल में' हा पिक्चर पाहिला. ( आता हाच सिनेमा का? याला काही उत्तर नाही. याचीच रिळं मिळाली म्हणून असेल !) मला हे खूप थ्रिलिंग वाटत होतं. म्हणजे थिएटर मध्ये जो प्रोजेक्टर बघत आलो त्या प्रोजेक्टरच्या अगदी शेजारी बसून मी सिनेमा बघत होतो. नुसती धमाल होती! शिवाय सिनेमातला तो देवकुमार-जो व्हिलन वाटे पण नंतर त्याचं रहस्य कळतं - तो येतो तेव्हाचं पार्शवसंगीत, किंवा एकूणच सगळाच सिनेमा अगदी जवळून बघायचा अनुभव वेगळाच होता.

३. आम्हांला आमच्या शाळेनेही काही सिनेमे दाखवले. शाळेच्या पटांगणात, जिथे आम्ही एरवी बोअरिंग पी टी च्या कवायती करत होतो, तिथेच आम्ही गॅदरींगच्या काळात आणि तेही रात्रीच्या वेळी, सिनेमेही पाहिले. (पांढऱ्या पडद्यावर !) एक मात्र आहे. सिनेमे खूप चांगले होते असं नाही. उदा- 'चरस' 'यादों की बारात' वगैरे.. पण याने आम्हांला आलेल्या मजेत तसूभरही कमी आली नाही !

                                                                                                                                                                       

४. कॉलेजच्या काळात घडलेला हा प्रसंग आहे. आमचा १४-१५ जणांचा मित्र- मैत्रिणींचा ग्रुप होता. पण आम्हां ४-५ जणांना सोडून बाकीचे सगळे निलायम थिएटरला पिक्चर बघायला गेले. गोष्ट तशी छोटी होती. पण तेव्हा आम्हांला ती खटकली होती. मग आम्ही ठरवलं की ते सगळे ज्या सिनेमाला गेले होते त्याच सिनेमाला आपणही जायचं. अगदी खुन्नस घेऊन! आणि त्यांना इंटरव्हलला मुद्दाम भेटायचं. आम्ही चौघे थिएटरवर पोचलो खरे पण चौघांच्या तिकिटाचे पैसे आमच्याकडे होते की नाही हे पाहिलंच नव्हतं. मग अगदी चिल्लर नाणी वगैरे काढून जेमतेम ते पैसे भरले. पिक्चर कुठला? तर अनिल कपूरचा डबल रोल असलेला 'किशन कन्हैय्या'! इंटरव्हलला सगळ्यांना भेटलो वगैरे... सिनेमा इतका OTT ( Over The Top) होता की काही विचारायची सोय नाही! त्यामुळे 'त्या' ग्रुप मधला आमचा एक मित्र आणि आम्ही चौघे क्लायमॅक्सची १५-२० मिनिटं उरलेली असताना सिनेमा सोडून निघून आलो ! (अर्थात सिनेमा बघण्याचा मूळ हेतू साध्य झाला होताच!)

                                                                                                                                                 .... (क्रमश:)

सिनेमा आणि आठवणी-१

सिनेमा आणि आठवणी-१
कित्येकदा प्रत्यक्ष सिनेमा बघण्याइतक्याच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या प्रसंगांमुळे तो सिनेमा अधिक संस्मरणीय ठरतो. माझ्या बाबतीत हे असं अनेक वेळा घडलंय. त्याचीच ही काही उदाहरणं -
१. मी महाराष्ट्र मंडळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होतो(टिळक रोड). त्यावेळी ती शाळा चौथीपर्यंतच होती. पाचवीपासून पुढे गुलटेकडीजवळ तीच शाळा. चौथीचा शाळेचा शेवटचा दिवस होता. आम्हांला सेंड ऑफ होता. मी कागदाच्या छोट्या चिटोऱ्यावर भाषण लिहिलं होतं( मी कुठलं ? आई बाबांनीच ते लिहिलं असणार!) मला आता आपली शाळा बदलणार, इथे परत कधीच यायचं नाही त्यामुळे हुरहूर वगैरे असं काहीच नव्हतं. कधी एकदा ते भाषण संपवतो असं झालं होतं. वर्गाबाहेर आई-बाबा आणि बहीण आले होते. शाळेतूनच परस्पर जवळच्या अलका टॉकीजला जायचं होतं. आपण वेळेत पोचू ना याची चिंता जास्त ! तर अशा प्रकारे शाळेच्या खाकी गणवेशात मी 'त्रिशूल' पाहिला !

२. त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत एक तर आम्ही आमच्या मामा-मावशांकडे किंवा काकांकडे जायचो किंवा आमची चुलत-मामे-मावस-आते भावंडं आमच्याकडे यायची. एकदा आम्ही नाशिकला आमच्या मावशीकडे गेलो होतो. लहान-मोठे सगळे मिळून सहज २०-२५ जण होते. मावशीचं घर रविवार कारंजाजवळ होतं. नदीपासून अगदी जवळ ! एवढ्या लोकांच्या अंघोळी वेळेत उरकण्याचा कदाचित प्रश्न होता. तेव्हा आमच्या बाबांनी शक्कल लढवली. ते म्हणाले जे कोणी नदीवर अंघोळीला येतील त्यांना संध्याकाळी सिनेमा दाखवीन. मग काय! सगळे जण पटापट तयार! आणि मग संध्याकाळी बाबांनी आम्हांला सगळ्यांना 'मि. नटवरलाल' दाखवला !

३. पुण्यात 'रॉकी' सिनेमा (संजय दत्तचा,सिल्वेस्टर स्टॅलनचा नव्हे !) आमच्या निगडीच्या काकांच्या फॅमिली बरोबर पाहिला. संपूर्ण चित्रपटभर मी मुसुमुसू रडत होतो. नाही, संजय दत्तच्या अभिनयामुळे मला रडू येत होतं असं नाही. तर त्यावेळी माझे डोळे आले होते. त्यावेळी एवढा अवेअरनेस नव्हता की डोळे आलेले असताना असं पब्लिक मध्ये जाऊ नये वगैरे !
४. आता विचार करताना असं वाटतं की आम्ही कुठलेही चित्रपट पाहिलेले आहेत ! ते ऐन पावसाळ्याचे दिवस होते. आमच्या घराजवळ त्यावेळी एकच थिएटर होतं- 'लक्ष्मीनारायण' ! धो धो पावसात तिथे(व्होल्गा चौकात) भरपूर पाणी साठायचं. अशावेळी एकदा आम्ही गुडघाभर पाण्यातून वाट काढून, चिंब भिजलेल्या अवस्थेत जाऊन कुठला पिक्चर पाहिला असेल? तर अमजद खानचा 'प्यारा दुश्मन'! (हो... तोच तो- 'हरी ओम हरी' वाला !)
५. कॉलेजच्या पहिल्या वर्षात योगायोगाने शुक्रवारी असं व्हायचं की दुपारच्या जेवणानंतर तब्बल ३ लेक्चर अशा विषयांची ( आणि अशा शिक्षकांची !) असायची की हमखास झोप यायचीच! बरं उघडपणे झोपायचीही सोय नव्हती ! मग सर्व मित्रांनी संपूर्ण विचारांती असा निर्णय घेतला की या लेक्चरना न बसता तो वेळ सिनेमा बघून सत्कारणी लावावा. मग आमचा दर शुक्रवारचा एक रिवाज बनून गेला. जेवणाच्या सुट्टीनंतर कर्वे रोड वरून सायकलने राहुल थिएटरला जायचं ! यातूनच स्टॅलन, ब्रूस ली पासून ते क्लिंट ईस्टवूड, बॉण्ड पटांपर्यंत प्रामुख्याने action movies बघितले. एकदा असाच 'डर्टी हॅरी' बघायला गेलो होतो. थोडा उशीर झाला होता. सिनेमा चालू झालेला होता. मिट्ट काळोखात माझी सीट कुठे आहे हे मी हाताने चाचपडत शोधत होतो. 
अचानक एका माणसाचा कळवळून आवाज आला- 'अहो इथे रिकामी सीट नाहीये हो !' नंतर लक्षात आलं की तिथे एक यंग कपल आलं होतं आणि अनवधानाने मी रिकामी खुर्ची शोधताना... चुकून... जाऊ दे !
तेव्हापासून मी निश्चय केलाय की सिनेमा अगदी पांढऱ्या पडद्यापासून बघायचा !
उशीरा कधीच जायचं नाही!                                                                                                       .... (क्रमश:)

Musical Journey of Film 'Anuradha'

'Anuradha' is a movie by director Hrishikesh Mukherjee released way back in 1960, is still a classic because of all the elements- the story,direction,acting, lyrics(Shailendra) &  music(by Pandit Ravi Shankar). It is one movie in which the music & the story blend so well that they are inseparable. So in this blog, I am going to take you for a musical journey of 'Anuradha'..
Director Hrishikesh Mukherjee

Music Director Pt Ravi Shankar









Lyricist Shailendra

The movie begins with Lata Mangeshkar’s rendition of Bhairavi- ‘Saware Saware kahe mose jora jori’…the song is relayed on AIR & helps establish the fact that the story is about the 
protagonist Anuradha (played by Leela Naidu)who was a popular singer 10 years back.
The director unfolds the story sensitively & also using the flashback technique. That the Music is so very close to Anuradha’s heart is established through a longish musical play (sung by Mahendra Kapur, Manna Dey & Lata). 
This also helps to bring Anuradha & Dr. Nirmal(played by Balraj Sawhney) close. The rosy, romantic, dreamy phase of their life is epitomized by the fast paced, bubbly song based on raag Tilak -Shyam- ‘Jane kaise sapnon mein kho gayee akhiyan’.
The dream that she saw of togetherness changes with time -as the doctor, committed as he is to the service of the poor patients of the village, is unable to give any time to her. She has sacrificed her passion-music, but he remains engulfed in his work. So much so that even the smallest far away sound of music disturbs his concentration. She longs for his company, his love.. This is emphasized by beautiful background music score which Pandit Ravi Shankar has used. We hear so many of Sarangi pieces.(in raagas like Malkauns, Darbari Kanada). One is on the tune of ‘Piya ke milan ki aas’-based on morning Raga- Jogiya. This matches with situation well. It is their wedding anniversary & he has promised her to come home in time. But is held up with emergency case & comes next morning.
Not just Sarangi, but we also have flute pieces( one I think in Raag Rageshri) & of course Sitar pieces as well.As the circumstances would have it, she suddenly meets the same person-Deepak (Abhi Bhattacharya) whom her father wanted her to get married. Deepak loves her & her music intensely. He asks her to sing a song for her. And then we have the song- ‘Kaise din beete kaise beeti ratiyan piya jaane na’… based on raag Manj Khamaj.. 

The beginning of ‘Haaye’ the boltaan ,has been rendered so piercingly by Lata that it conveys all the hurt & pain of the wife in that situation. The director shows the doctor here who is oblivious to her sufferings- engrossed in reading his medical book. The yearning for love is further exemplified by the lyrics-‘khilne ko tarse nanhi nanhi kaliyan’..
With the further turn of events, she is about to leave the doctor & go back to her father along with Deepak. Dr. asks her to wait for a night as some guests are to visit them for dinner. The guest who is also a doctor understands the situation instantly. Anuradha sings another song-‘ ‘Haaye re wo din kyo na aaye’ A song based on Raag Kalavati (or is it Jansammohini?) This songs also puts forth her feeling state-‘sooni meri Beena sangeet bina, Sapnon ki mala murjhaye’ ‘Haaye re wo din kyu na aaye, ja ja ke ritu laut aaye’. 

The guest(Nazir Hussain) helps to salvage the situation as he gives due credit of her sacrifice & contribution in the success of the doctor’s career. The movie ends on a happy note- Anuradha doesn’t depart the next morning. But is shown to clean the dust in the house, throwing it out of the house. As in the beginning, towards the end too we hear Bhairavi(again Sarangi)…