Saturday 21 December 2013

मोहम्मद रफी २ : हुई शाम उनका खयाल आ गया . . .













संध्याकाळची वेळ . .  हुरहूर लावणारी . . . दिवस कसातरी कामाच्या व्यापात गेल्यावर येते ती संध्याकाळ ! गुलाम अली-आशा भोसले यांच्या गझल मधले काही शब्द उसने घेतले तर-  
दिन भर तो मैं दुनिया के धंदो में खोया रहा 
 जब दीवारो से धूप ढली . . . 
 तुम याद आये . . तुम याद आये । 
तर अशा व्याकूळ आठवणींची ती संध्याकाळ ! विरह, एकटेपणा, प्रेमभंग, नैराश्य, नात्यांमधले गैरसमज या सगळ्यामुळे विचारात बुडायला लावणाऱ्या संध्याकाळी साथ देते मदिरा आणि मग त्या दु :खाला आणखी गहिरेपण प्राप्त होते. हिंदी सिनेमात असे प्रसंग अनेक वेळा दाखवण्यात येतात. अनेक गायकांनी अशी गाणी गायली आहेत. पण यातच आणखी थोडी वर्गवारी केली तर? मोहम्मद रफी यांनी गायलेली, संध्याकाळ -रात्र या समयातील,  तिची आठवण आणि त्याने होणारा त्रास हा विषय असलेली ही तीन गाणी आहेत. या गाण्यात आणखी एक सांगीतिक समान धागा आहे-जो तुम्ही ओळखायचा आहे! माझ्या आवडीप्रमाणे मी यांचा क्रम लावला आहे. तो तुम्हाला मान्य असेलच असे नाही.

१) हुई शाम उनका खयाल आ गया- चित्रपट मेरे हमदम मेरे दोस्त 
संगीतकार लक्ष्मीकांत -प्यारेलाल जोडीच्या कुठल्याही १० सर्वोत्तम गाण्यांमध्ये हे गाणे यावं  अशा पात्रतेचं हे गाणं. मी तर पुढे जाउन म्हणेन की त्यांनी जर फक्त हे एकच गाणे केले असते तरी ते महान संगीतकार ठरले असते. या गाण्यात 'सवाल'  ''मलाल' 'चाल' या शब्दांवर मोहम्मद रफींनी अशी काही करामत केली आहे की बस्स! मजरूह सुलतानपुरी यांची ही गझल मनाला खोल जाउन भिडते. त्यामुळे या गाण्यातला तो तकलुपी सेट, फर्निचरची भीषण रंगसंगती काही खटकत नाही.



२) है दुनिया उसीकी जमाना उसीका -चित्रपट काश्मीर की कली 
या सिनेमातल्या इतर हलक्याफुलक्या,उडत्या ठेक्याच्या गाण्यांमध्ये देखील हे गाणे आपली वेगळी छाप पाडून जातं. ओ. पी. नय्यर यांच्या टिपिकल टांगा ह्रिदम पेक्षा संपूर्णपणे वेगळं असं हे  गाणं. शम्मीकपूरला रफीचा आवाज का suit व्हायचा याच्या कितीतरी खुणा या गाण्यात दिसतील.

https://youtu.be/WO_aMRsEIIY

३) दिन ढाल जाये रात न जाये- चित्रपट गाईड 
या  एस डी च्या गाण्यातील पहिले काही शब्द त्याच चालीत त्यांचा सुपुत्र आर डी यांना 'किनारा' चित्रपटातील 'अब के ना सावन बरसे' यात वापरावेसे वाटले म्हणजे या मूळ गाण्याचे माहात्म्य लक्षात यावे. यात interlude मधल्या काही तुकड्यांमध्ये वीणा वापरलंय की ती गिटार आहे ?
https://youtu.be/HrbzfLFj6Es

(Disclaimer : एक डॉक्टर या नात्याने मला हे सांगावेसे वाटते की ही गाणी पोस्ट करून किंवा त्याबद्दल लिहून मी कुठल्याही प्रकारे दारू पिण्याचे समर्थन किंवा उदात्तीकरण करू इच्छित नाही !)
(जर तुम्हांला या तिन्ही गाण्यांचा सांगीतिक समान धागा लक्षात आला नसेल आणि तो जाणून घेण्याची इच्छा असेल तर- या तिन्ही गाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात सॅक्सोफोनचा वापर करण्यात आला आहे)

Friday 20 December 2013

मोहम्मद रफी

हिंदी सिनेमांत असा प्रसंग अनेक वेळा बघायला मिळतो . अर्थात मी आमच्या वेळच्या सिनेमांबद्दल बोलतोय.(म्हणजे अगदी इसवीसनापूर्वी नव्हे पण तरीही त्या मानाने जुन्याच!)  सध्याच्या नाही. म्हणजे असं असतं की कोणाच्या (हिरोईन किंवा तिची मैत्रीण) तरी घरी पार्टी असते .छान वातावरण असतं. अर्थातच पार्टीला साजेसे कपडे असतात. उंची खाणं/पिणं . . . हसणं-खिदळणं . . . कधीकधी नाचणं देखील ! मग अचानक सगळ्यांना शांत बसण्याची सूचना दिली जाते आणि कोणीतरी हिरोला गाणं म्हणण्याची विनंती करतं.हिरो महाशयांना या पार्टीच्या निमित्ताने एक नामी संधी मिळते - जिच्यावर मी (म्हणजे हिरोने!) एवढं नि:स्वार्थी, निस्सीम, निरतिशय वगैरे प्रेम केलं, ती कशी 'बेवफा' निघाली! हिरो गाणं सुरू करतो आणि सगळे एकदम चिडीचूप ! आधीचा सगळा तो मूड . . . तो माहोल . .  सगळं गायब. . .  हिरो आपल्या शब्दांच्या करामतीतून सूचकपणे किंवा कधी कधी उघडपणे जी कैफियत मांडतो  ती सगळे अगदी मनोभावे तल्लीन होऊन ऐकू लागतात.कोणीही त्याला थांबवत नाही- " अरे आम्ही कशासाठी आलो आणि तू हे काय रडगाणं गातोयस?"  असं विचारतही  नाही . क्वचित दोघांची एखादी कॉमन मैत्रीण सूचक हसते किंवा ती जर 'खल-प्रवृत्तीची ' असेल तर तिला अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटतात! हिरोला मिळवण्याच्या तिच्या मार्गातला हिरोईन नामक काटा दूर झाल्याचा तो आनंद  असतो. पण हिरोचं गाणं चालू राहतं. माझ्या (म्हणजे हिरोच्या !) 'अशा प्रेमाचा तू स्वीकार का केला नाहीस ? आता या प्रेमभंगामुळे मी 'गम' मध्ये बुडून जाईन' वगैरे वगैरे . . . . 

अशा सुरुवातीला आनंदी वातावरण पण नंतर सॅड प्रसंगातील गाणी मात्र खूप छान असतात. कित्येकदा ही गाणी या पार्श्वभूमीचा विचार न करता ऐकली किंवा ती जर माहीतच नसताना ऐकली तर ती रत्नजडित खजिन्यासारखी वाटतात. अशी गाणी आधी ऐकली आणि नंतर त्याचे दृश्य स्वरूप पाहिले की केवढी निराशा होते ! याचे एक अस्सल उदाहरण तुम्हांला सांगतो - कोणे एके काळी 'हवस' नावाचा सिनेमा आला होता. अनिल धवन आणि नीतू सिंग यांचा. सध्याच्या पिढीला हे अभिनेते ओळखण्याची/लक्षात ठेवण्यासाठी एक क्लू म्हणजे- वरूण धवनचे काका आणि RK ची आई ! तर त्यात एक अप्रतिम गाणं होतं - 'तेरी गलियो में ना रखेंगे कदम आज के बाद.. . '  संगीतकार उषा खन्ना, गायक मोहम्मद रफी ! साधे सोपे शब्द, दर्दभरी चाल. . .  interlude संगीतही छान. .  तेरी गलियो में या पहिल्या ओळीच्या ( आणि नंतर कडव्याच्या शेवटीही ) मागे मागे जे व्हिसल ऐकू येतं ते खूप छान वाटतं . रफीच्या आवाजाने या गाण्याचे सोने केले आहे. या गाण्याची लिंक देत आहे. मात्र मी सल्ला देईन की आधी ते फक्त ऐका आणि मग व्हिडीओ पाहा. . .
व्हिडीओ विनोदी आहे आणि हे मी फारच सौम्यपणे म्हणतोय. या सिनेमाच्या ड्रेस डिझायनर, हेअर डिझायनर, मेकअप मन यांना अजूनपर्यंत कोणी विशेष पुरस्कार दिला नसेल तर तो जरूर द्यावा असं मला वाटतं. पण सगळ्यात मोठं बक्षीस कास्टिंग विभागाला द्यावं  -त्यांनी या गाण्यात नीतूसिंगच्या डाव्या बाजूला बसलेला हिरा शोधून काढल्याबद्दल ! असा नग आहे की त्यापुढे अनिल धवनही ग्रीक देव वाटावा ! थोडक्यात गाणं आणि त्याचं चित्रीकरण यात प्रचंड तफावत असलेलं आणि तरीही संस्मरणीय असलेलं हे गाणं !

Saturday 26 October 2013

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा -पं. हृदयनाथ मंगेशकर !






एखाद्या कलाकाराबद्दल बोलण्याइतका माझा अभ्यास नाही, अधिकार तर त्याहून नाही. मला आपले सगळेच कलाकार आवडतात . मग ते अभिनय क्षेत्रातले असोत वा संगीत ! एखाद्या सर्वसामान्य श्रोत्याप्रमाणे मला आपलं वाटतं की ज्या कलाकाराचं गाणं रेकॉर्ड झालं आहे त्याची काहीतरी पात्रता नक्कीच असणार ! शिवाय कुठल्याही गायकाला टाकाऊ समजलं  तर त्याने गायलेले चांगले गाणे देखील आपल्या पूर्वग्रहामुळे आपल्याला आवडत नाही. महेंद्र कपूर हा देखील असाच एक गायक ! पूर्वी मोहमद रफीची नक्कल करतो म्हणून हिणवला गेलेला. नंतर बी ग्रेड सिनेमातील सी ग्रेड गाणारा असा उगाचच लौकिक झालेला. तरीही त्याची आणि संगीतकार रवि या जोडीची गाणी केवळ अप्रतिम ! ' गुमराह' असो की ' हमराज'. 'वक़्त' असो की 'जिंदगी और मौत'! 'हमराज' मधलं 'न मुह छुपाके जियो' या एका गाण्यासाठी सुद्धा मी महेंद्र कपूरला महान गायक मानायला तयार आहे. त्यातलं तार सप्तकात गायलेलं कडवं हे अजिबात सोपं नाही आणि विशेषत: त्याकाळी, जेव्हा रेकॉर्डिंगचं  तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. म्हणजे टेक्नोलॉजी मुळे करामत न करता आवाजाच्या नैसर्गिक देणगीच्या जोरावर त्याने हे गाणे गायलंय. खूपच मोकळेपणाने गाणारा कुठलाही गायक काही वेळा लाउड गातो. तसा महेंद्र कपूरही गायलाय. पण मधूनच तो ' प्यार जिंदगी है' या 'मुक़द्दर का सिकंदर' या गाण्यात सुखद धक्का देऊन जातो तर त्या आधीचीही त्याची काही सुरेख गाणी आहेतच- 'तेरे प्यार का आसरा चाहता हू '(धूल का फूल) किंवा नवरंग मधली गाणी किंवा- 'रफ्ता रफ्ता वो हमारे दिल के अरमान हो गये' (आशा भोसले सह 'हम कहा जा रहे है' मधलं ) 
मराठीतही महेंद्र कपूर उत्कृष्ठ गायले आहेत. हिंदी गाण्यात काही वेळा त्यांचा पंजाबी लहजा डोकावतो. पण मराठीत असं अजिबात वाटत नाही . मी तर म्हणेन की मन्ना डे यांच्या इतकंच सुंदर काम महेंद्र कपूर यांनी मराठीत केले आहे. संख्येने तर जास्त केलंच आहे पण गुणवत्तेने ही तोडीस तोड ! आणि या एका बाबतीत तरी मला हा शिष्य त्यांचे गुरु मोहमद रफी यांच्यापेक्षा वरचढ वाटतो. रफी यांनी गायलेली मराठी गाणी ही वेगळं बेअरिंग घेऊन गायल्यासारखी वाटतात असं माझं मत आहे . परंतु दादा कोंडके यांच्या सिनेमातला दादांचा आवाज असा काहीसा नकारात्मक शिक्का बसला असेल किंवा काही गाणी खरंच अनुल्लेखाने मारावी अशा टाकावू प्रकारची असतील. पण महेंद्र  कपूर हे also ran प्रकारात मोडले गेले. 

पण आज महेंद्र कपूर यांच्याविषयी का लिहितोय? ना आज त्यांचा जन्मदिवस ना पुण्यतिथी !

खरं तर आजचे(२६ ऑक्टोबर) ' बर्थ डे बॉय' आहेत पं. हृदयनाथ मंगेशकर ! मराठीत या दोन कलाकारांनी ३ अतिशय सुंदर गाणी केली आहेत. मुळात महेंद्र कपूर यांच्या बरोबर गाणी करावीत हा योग कसा जुळून आला असेल याच्या बद्दल मला कुतूहल आहे. म्हणजे ही तीन गाणी एका अल्बम साठी केली आहेत असं वाटत नाही. यातलं एक चित्रपट गीत आहे आणि दोन भावगीतं ! एखाद्या गाण्यासाठी अमुक अमुक गायक(किंवा गायिका) ही निवड कशी ठरत असावी? कदाचित हा माझा पूर्वग्रह असू शकेल पण हृदयनाथ मंगेशकर आणि महेंद्र कपूर हे मला अगदी भिन्न प्रकृतीचे कलाकार वाटतात. ते एकत्र  काम करू शकतील असं वाटत नाही. ही गाणी इतर कोणालाही ते देऊ शकले असते. इतकंच कशाला ही गाणी ते स्वत: सुद्धा गाऊ शकले असते.ही गाणी गाऊन  महेंद्र कपूर यांनी मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे असं वाटतं. तीनही गाणी नामांकित कवींची आणि त्यामुळे शब्दांमध्ये फेरफार करायला, अमराठी गायकाला सोपं जाईल असे बदल करायला फारसा काही वाव मिळाला नसावा. शब्दांच्या अचूक उच्चारांसह  भावही तितक्याच समर्थपणे पोचवण्याचे काम महेंद्र कपूर यांनी या गाण्यांतून केलं आहे.

यातलं पहिलं गाणं आहे सुरेश भटांचं -' पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी'
https://www.youtube.com/watch?v=wbpdlwaFSjA
हृदयनाथ मंगेशकरांची नेहमीची अवघड, अनवट चाल आणि शब्द-सुरांतून उत्तरोत्तर गहिरे होत जाणारे घनगंभीर, वेदनामय नैराश्य ! 

दुसरं गाणं काशिनाथ घाणेकर यांच्यावर चित्रित झालेलं -'रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा' हे 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटातलं !
एखाद्या चांगल्या गाण्याची ढिसाळ चित्रीकरणामुळे वाट कशी लावावी याचे (वसंत जोगळेकरांची क्षमा मागून) हे गाणे उत्तम उदाहरण असावे ! गाण्याचा ह्रिदम आणि saxophone चा भरपूर वापर  यावरून हे टिपिकल हृदयनाथ शैलीचं गाणं वाटत नाही. पण सिनेमाच्या गूढ कथानकाला हे गाणं साजेसं वाटतं.

या ३ पैकी माझं सर्वात आवडतं गाणं म्हणजे-आरती प्रभू लिखित-'ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते' हे गाणे !  
खरंच सांगतो, मागे एका ' सा रे ग म प' च्या कार्यक्रमात स्वतः हृदयनाथ मंगेशकरांनी सांगेपर्यंत मला हे माहित नव्हते की हे गाणे कवी/लेखकाच्या प्रतिभेला उद्देशून आहे! या गाण्यात माझ्या आवडत्या accordionचा मस्त वापर आहे. तसेच ' ती येते'  हे म्हणतानाचे हेलकावे ऐकायला फार छान वाटतात. एके ठिकाणी अंतऱ्याकडून मुखडयाकडे  येताना 'ती ' वर जो जोर दिलाय ना ते ही मस्तच! 
ही तीन गाणी गाऊन  मासेसचा गायक क्लासेसचा ही कसा होऊ शकतो याचा पुरावाच महेंद्र कपूर यांनी दिला आहे.

Wednesday 25 September 2013

' लता-वसंत' पर्व

   


ज्यांच्या गाण्याने  भरभरून आनंद मिळाला आणि मूड कुठलाही असो ज्यांची गाणी ऐकल्यावर नेहमीच शांत, सात्विक समाधान मिळालं अशा लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त (२८ सप्टेम्बर )आज एका काहीशा मागे पडलेल्या वसंत प्रभूंबरोबरच्या त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी थोडेसे -


भावगीतातील  वैभवशाली असे 'वसंत पर्व' लता आणि वसंत प्रभू या जोडीच्या  गाण्यांमधून दिसते. बऱ्याच अंशी पी. सावळाराम यांचे शब्द, त्यावर प्रभूंनी केलेले  लता यांच्या आवाजाचे कोंदण असा छान त्रिवेणी संगम या  गाण्यातून दिसून येतो. स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित व  सोप्या  शब्दांत भाव पोचवणारी ही गाणी म्हणूनच लोकप्रिय झाली. 'लेक लाडकी या घरची' हे लग्न ठरलेल्या मुलीच्या मनातील भाव व्यक्त करणारे गाणे, 'गंगा यमुना डोळ्यात उभ्या का' असं लग्न झालेल्या मुलीला निरोप देतानाचे गाणे किंवा 'बाळा होऊ कशी उतराई' हे एका आईने व्यक्त केलेली भावना दर्शवणारे गाणे ! सर्वसामान्य आयुष्यातील हे महत्त्वाचे टप्पे ! सहज ओठावर रूळतील असे शब्द, कमीतकमी वाद्यमेळ आणि लता मंगेशकर यांचा तो बहरत्या काळातला आवाज! यामुळे अशाप्रकारची अनेक प्रासादिक गाणी जन्माला आली. लोकांना ती आपलीशी वाटली आणि त्या काळी रेडिओ व्यतिरिक्त फारसे इतर माध्यम नसताना देखील ती खूप लोकप्रिय झाली. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, सी. रामचंद्र, वसंत देसाई, वसंत पवार यासारख्या संगीतकारांच्या ऐन बहराच्या काळात यामुळेच वसंत प्रभू आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करू शकले ! त्यांच्या गाण्यांची ही लिंक देत आहे. ही ऑडिओ लिंक आहे. चक्क रेडिओच आहे हा . त्यामुळे नोस्टाल्जियाचा ही आनंद ! 

Monday 16 September 2013

तुम्ही 'कास' ला (प्लीज) जाऊ नका. . ...


काल कास पठारावर फुलं पहायला गेलो होतो. याआधी आम्ही २०१० साली गेलो होतो त्यानंतर ठरवलं की इतक्यात काही परत जायचं नाही. आता ३ वर्षांनी गेल्यावर पुन्हा हेच वाटतंय ! म्हणजे फुलं नव्हती म्हणून असं म्हणतोय का - तर नाही. . . रग्गड फुलं पाहिली . . . अगदी डोळे भरून ! नयनरम्य/नयनमनोहर/नेत्रसुखद वगैरे सगळी विशेषणं अनुभवली. . . पण . . . तिथे पोचेपर्यंतचा प्रवास . . . ती गाड्यांची भीषण गर्दी.  तो भयाण ट्राफिक जाम . . काहींचे भयंकर ड्रायव्हिंग. .  सगळं भयानक होतं. . . तिथे जी काही व्यवस्था होती ती या गर्दीमुळे पार कोलमडून गेली. आम्हांला वाटलं की गणेशोत्सव आहे . . . लोकं गणपतीत दंग असतील. . त्यामुळे कासला कोण जाईल ? पण आमच्यासारखाच स्मार्ट विचार करणारे हजारो लोक होते. आता आपल्याकडे गर्दी म्हणजे  हौशे/गवशे /नवशे असतात. ते इथेही पाहायला मिळाले-
१) एक हिरो फुलांच्या ताटव्यात आपला पृष्ठभाग टेकवून, उसेन बोल्टची जग जिंकल्याची पोझ देत फोटो काढून घेत  होते.
२) एक आजोबा हातात रानहळदीचे फूल मशाल घेतल्याप्रमाणे मिरवत होते. त्यांचा फोटो काढताहेत म्हटल्यावर लगबगीने आजीसुद्धा त्यांच्याकडची फुलं घेऊन फोटोत येत्या झाल्या .
३) कानामागे सुतार लोक पेन्सिल लावतात तशी  फुलं लावून कुणी हिंडत होते.
आम्ही फुलावर पाय पडू  नये म्हणून  इतके काळजीपूर्वक, खाली मान घालून चालत होतो . . .  पण बाकीचे अगदी निवांत जात होते . . . बेधडक आमच्या हृदयाचा ठोका चुकवत . . . फुलं पायदळी तुडवत !
४) एका लहान मुलीला तिच्या आई-वडिलांनी शिक्षा म्हणून उपाशी ठेवले होते कि काय माहित नाही पण ती चक्क फुलं खात होती. आई शप्पथ ! अजिबात खोटं नाहीये हे ! 
५) चॉकलेटचे wrappers, प्लास्टिक पिशव्या,बाटल्या सगळं काही सगळीकडे  पसरलेलं होतं . . 
६) जिथे नो पार्किंग झोन होता तिथेच शेकडो गाड्या लावून शांतपणे लोक फुलं बघायला निघून जात होते. नियमांची ऐशीतैशी त्या ! जिथे प्रवेश निषिद्ध होता तिथे मुद्दाम जात होते . . 

हे सगळं आजूबाजूला घडत असताना, त्यामुळे चिडचिड होत असताना डोळ्यांना सुखावणारी फुलं आणि अंगाला/ मनाला ताजातवाना करणारा आल्हाददायक, गार वारा असं मात्र छान रसायन होतं. . . पार्किंग पासून पठारापर्यंत चालत जाण्याचा शीण या वाऱ्याने  कुठल्याकुठे पळाला. . . कास तलाव, तिथले हिरवे डोंगर, उतरलेले ढग. .  प्रसन्न वाटलं! 
ही  सोनकीची फुलं !

आणि हा लाल तेरडा ! याचं शास्त्रीय नाव - Impatiens oppositifolia ! Impatiens हे जर अधीर या अर्थाने नाव असेल तर ते अगदी समर्पक आहे. . . उमलण्यासाठी अधीर . . जिथे जागा मिळेल तिथे येण्यासाठी अधीर . . . क्षणभंगुर आयुष्यात स्वतः आनंद घेत . .  दुसऱ्यालाही तो देण्यासाठी !
 

मराठीत काही नावं खूप छान वाटतात- आता याच फुलाचं पाहा- याचं नाव आहे सीतेची आसवं! या फुलावरील पांढरा ठिपका अश्रू सारखा दिसतो म्हणून हे नाव दिले असावे.इथे तेरड्याच्या बरोबरीने ही फुले दिसत आहेत-
 


ही पांढरी फुलं आहेत- Eriocaulon sedgwickii. . . . 
तेरड्याचा लाल रंग, सोनकीचा पिवळा, सीतेची आसवं निळसर 
जांभळी आणि या सगळ्याचा समतोल साधणारा पांढरा रंग !
 


हे असं vanilla ice cream उधळलेलं पाहूनच कदाचित त्या मुलीला ही फुलं खावीशी वाटली असतील !
 




 

या पिवळ्या फुलांना कावळा म्हणतात! एका लाजऱ्या आणि साजऱ्या  फुलाला कावळा का बरं म्हणत असावेत कोण जाणे?
 

या छान तुर्रेदार फुलांचं नावही भारदस्त आहे- Pogostemon deccanensis !
 

या झुडपांना फुलं नाहीत. कारण फुलं येणं ही यांची सप्त-वार्षिक योजना आहे . आम्ही २०१० मध्ये आलो होतो तेव्हा याची फुलं होती .म्हणजे आता पुन्हा भेट २०१७ ?हेच ते (टोपली ) कारवी !
 

या नाजूक फांदीच्या आणि फुलांच्या झाडाचं नाव बहुदा-Oldenlandia corymbosa आहे -
 

हे ही त्याच प्रकारचं । पण तेच नसावं ! हे चिंचुर्डी आहे का?-
 


हा फुलांचा आडवा दांडा म्हणजे बहुदा-Peristylus densus असावा - 
 


आणि ही रानहळद !-
 


तर ही आणि अशी आणखी काही फुलं पाहायला मिळाली. 
कास पठार हे युनेस्को घोषित World Natural Heritage site आहे त्यामुळे त्याचे जतन व्हावे या साठी खरोखरच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वर्तमानपत्रात याची सालाबादप्रमाणे फोटोरूपी 
जाहिरात आलीच नाही तरी या गर्दीला थोडा आळा बसेल. तिथे न जाणं हाच त्यावरचा सर्वोत्तम संवर्धनाचा मार्ग आहे  असं मला वाटतं. आपण न जाऊन गर्दी थोडीच कमी होणार आहे असाही विचार येऊ शकतो मनात! पण तरीही मी अगदी कळकळीची विनंती करतो की तुम्ही तिथे जाऊ नका आणि अशाप्रकारे हे कासचं नाजूक सौंदर्य आपण पुढच्या पिढीसाठी राखून ठेऊया ! तुम्ही जाऊ  नये म्हणून तर तुम्हांला ही सफर घडवली !
(आम्हीही २०१३ सालानंतर परत गेलेलो नाही !) 

(फोटोग्राफर- वृंदा पुसाळकर, स्मृती पुसाळकर )
 व फुलांच्या नावासाठी संदर्भ -  Flowers of Kas हे श्रीकांत इंगळहळ्ळीकर लिखित पुस्तक)




Wednesday 11 September 2013

स्मरण विनोबा भावे यांचे

                          

'भूक लागल्यावर खाणे म्हणजे प्रकृती 
भूक नसतानाही खाणे म्हणजे विकृती आणि 
भुकेल्यांना खायला घालणे ही संस्कृती !'

या वाक्यामुळे पहिल्यांदा मला विनोबा भावे कळले. ते नक्कीच हाडाचे शिक्षक असावेत असे वाटले कारण इतक्या नेमक्या शब्दात आणि सहज सोप्या शैलीत त्यांनी किती छान विचार मांडले आहेत ! 

या नंतर माझ्या वाचनात 'गीता प्रवचने' हे त्यांचे पुस्तक आले.  
 

भगवद गीतेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की ती महर्षी व्यासांनी सांगितली आणि गणपतीने लिहून घेतली. आधुनिक काळात हेच उदाहरण वापरायचे झाले तर हीच गीता धुळ्याच्या तुरुंगात विनोबा भाव्यांनी सांगितली आणि साने गुरुजींनी ती लिहून काढली ! २१ फेब्रुवारी १९३२ ते १९ जून १९३२ या ४ महिन्यांच्या काळात अतिशय रसाळ, ओघवत्या भाषेत गीतेचे सार वेगवेगळे दृष्टांत देऊन विनोबा भावे यांनी मांडले आहे. अन्यथा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भगवद गीता म्हणजे काय हे कधीच कळले नसते.(अजूनही ती  किती कळली आहे माहित  नाही !) सर्वसामान्य माणसांना समजेल अशी भाषा, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या प्रसंगातून, उदाहरणांमधून गीतेतील संकल्पना स्पष्ट होत जातील अशी शैली! वाचकाशी संवाद साधत मांडलेला विचार यामुळे हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते.

नंतर 'ज्ञान ते सांगतो पुन्हा' हे विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांवर  आधारित पुस्तक वाचले. पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे. 


अहिंसा, सर्वोदय, लोकशाही, शिक्षण इ. विविध विषयांवर विनोबा अतिशय सुस्पष्टपणे  लिहितात.हे सर्व विचार मांडताना कुठेही  क्लिष्टता दिसून येत नाही. उलट कमीत कमी शब्दात, उदाहरणांसह  त्या त्या विषयावरील आपली मते ते मांडतात. उदा- 'हिंदू' या शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात- हिंदू शब्दाच्या निरुक्ती मधून हिंदूची व्याख्या करता येऊ शकेल. पुढे जाऊन  ते निरुक्तीचाही अर्थ सांगतात. निरुक्ती आध्यात्मिक असते. चिंतनाच्या सुलभतेसाठी शब्दावर आधारित ती एक उपकारक कल्पना असते. यातून ते हिंदू या शब्दाची निरुक्ती करतात- हिंसेने ज्याचे चित्त दुभंगते, दु:खी होते त्याला हिंदू म्हणतात. या व्याख्येत हिंदूंच्या सहिष्णुतेचा आणि हिंदूंच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा व्यापक अर्थ सामावलेला आहे.तसंच त्यांनी मोक्ष या शब्दाचीही निरुक्ती सांगितली आहे तीही अतिशय सुंदर आहे-  मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष ! ते म्हणतात की हिंदू धर्म हा मुळातच मानवधर्म आहे. म्हणून त्याचा कोणताही एक धर्मग्रंथ नाही, कोणी संस्थापक नाही किंवा कोणताही पंथ नाही. 
विनोबा भावे यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, विज्ञान विषयक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर  चिंतन केलं आहे आणि सगळ्यांच्या  आयुष्यातल्या अनेक व्यावहारिक समस्या/प्रश्नांवर आचरणात  आणता येतील असे तोडगे सांगितले आहेत. महात्मा गांधी यांच्या सर्वोदय, स्वदेशी, ग्रामस्वराज्य अहिंसा, या सारख्या महत्त्वपूर्ण संकल्पनांचा त्यांनी विस्तारच केला आहे. 
विनोबा यांचे विचार कालसुसंगत आहेत. सध्याच्या काळातही  ते लागू होतात. याचं या पुस्तकातलं एक उदाहरण  देता येईल. ते म्हणतात - 'समाज आज त्रिदोषांनी पीडित आहे. माणसाचे स्वास्थ्य जर सुधारायचे असेल तर ह्या त्रिदोषांचे निवारण करावे लागेल. अन्यथा स्वस्थ माणसांचा स्वस्थ समाज निर्माण होऊ शकणार नाही. हे त्रिदोष कोणते? पहिला- पोषणाचा अभाव, दुसरा स्वैराचार/असंयम आणि तिसरा हवा-पाण्याचे प्रदूषण !' 
विनोबांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचं  एकाच शब्दात सार काढायचं झालं तर मला वाटतं तो शब्द करुणा असेल- अपार करुणा ! पण ही करुणा भाबडी नाही, तिच्या मागे एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि केवळ मानव समूहाचंच नव्हे तर अवघ्या सृष्टीच्या व्यापक हिताचा विचार त्यात सामावलेला आहे. 

आम्ही लहान मुलांच्या होमिओपथिक उपचारांसाठी वावोशी या पेण रस्त्यावरील गावांत नियमितपणे जात असतो. वावोशीतल्या आनंदवर्धिनी ट्रस्टच्या टिळक परिवाराकडून विनोबा भावे यांच्या गागोदे या जन्मगावाविषयी ऐकले होते. गागोदे हे वावोशीच्या पुढे काही किलोमीटरवर आहे. आम्ही एकदा  तिथे जाऊन आलो. एक अतिशय साधे खेडेगाव ! इथे जन्मलेली व्यक्ती राष्ट्रसंत झाली पण त्याचे फारसे काही अप्रूप गावात असावे असे वाटले नाही.विनोबा भावे यांच्या घरात त्यांच्या वापरातील वस्तूंचे एक छोटेखानी संग्रहालय करण्यात आले आहे. घरालगतच्या दुसऱ्या बैठ्या घरात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचे फोटो मांडण्यात आले आहेत. पण ते घर आणि बैठं संग्रहालय म्हणजे अगदी जीर्णावस्थेतील इमारती होत्या. त्याची कोणी खूप काही निगा राखत असेल असं वाटलं नाही. आमच्याबरोबर एक सर्वोदयी कार्यकर्ता होता. तो इमाने इतबारे सर्वोदय वाचनालय आजिवली या खेड्यात चालवतो. त्याच्या या उपक्रमाला इथल्या पंचक्रोशीत कितपत प्रतिसाद असेल असा प्रश्न आम्हांला पडला. पण तो काही नाउमेद झालाय असं वाटलं नाही. विनोबा भाव्यांचं कार्य अशा खेड्यांत पुढे नेणारा तो कदाचित शेवटच्या शिलेदारांपैकी एक असावा असं वाटलं. 

मला विनोबा यांच्या 'भूदान' या चळवळीबद्दल नेहमीच आश्चर्य वाटतं. सध्याच्या जमिनींचे भाव गगनाला भिडलेल्या आणि स्वतःच्या  सोडून इतरांच्या जागेतही  अतिक्रमण करण्याच्या काळांत तर हे अगदी ठळकपणे जाणवतं- त्या काळी लोकांनी आपल्या जमिनी दान कशा केल्या असतील? या मागे नेमकं काय आणि कसं घडलं असेल ? १९५१ ते पुढची तेरा वर्षे भूदान चळवळीतून सुमारे साडे सत्तेचाळीस लाख एकर जमीन भूदान म्हणून मिळाली . यासाठी विनोबा गावोगावी जाउन लोकांशी कशा प्रकारे संवाद साधत होते? या चळवळीने काय साधलं? आणि आता या चळवळीकडे वस्तुनिष्ठपणे कसं बघायचं? याचं काही documentation कुठे उपलब्ध आहे का ? असल्यास ते मला वाचायला नक्की आवडेल. (ता.क.-मला अलिकडेच कळलं आहे की साधना प्रकाशन ने या भूदान चळवळीचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक प्रकाशित केलं आहे - अवघी भूमी जगदीशाची. लेखक आहेत पराग चोळकर. पुस्तक अजून वाचलं नाही पण वाचायची खूपच इच्छा आहे.)

राष्ट्रसंत म्हणून नावाजलेले मात्र तरीही आणीबाणीचे समर्थन केल्यामुळे उगीचच बदनाम झालेले, भूदान चळवळीचे प्रवर्तक, आद्य सत्याग्रही अशी विनोबा भाव्यांची अन्य काही वैशिष्ट्ये ! आज ११ सप्टेंबर ह्या त्यांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण ! 
विनोबा भावे यांच्या विषयी अधिक माहितीसाठी  त्यांच्या नावाने चालवल्या जात असलेल्या काही संकेतस्थळांना  अवश्य भेट द्या . इथे त्यांचे समग्र साहित्य/विचारही वाचायला मिळतील. संकेतस्थळांची  लिंक येथे देत आहे-

Thursday 22 August 2013

मंतरलेला काळ, मंतरलेला क्षण ...

(मंगळवार २० ऑगस्ट २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर लिहिलेला हा ब्लॉग... )


मंगळवारच्या घटनेनंतर  मनात आलेल्या तीव्र आणि विविध भावना आता थोड्या प्रमाणात निवळण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आणि याचबरोबर मनात येताहेत जुन्या आठवणी ! एखाद्या चल -चित्राप्रमाणे पण काही वेळा संगती न लागणाऱ्या, आठवणी येत आहेत . . . . 

या आठवणी आहेत मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काही काळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जोडलो गेलो होतो त्या काळाच्या ! साधारणपणे १९८७पासून ते १९९० पर्यंतचा हा काळ असेल. म्हणजे सध्या जसं २४ तास टीव्हीचं बोम्बारडिंग असतं तसं तेव्हा नव्हतं . . ना मोबाईल . . . ना इंटरनेट. . . पण त्या कॉलेज काळातील वयाला अनुसरून bubbling energy मात्र निश्चित होती . प्रत्येकजण आपापल्या स्वभाव आणि शरीर धर्माप्रमाणे कुठल्या न कुठल्या उपक्रमात सहभागी व्हायचा. संगीत/नृत्य हे छंद असोत किंवा मग गिर्यारोहण, खेळ, व्यायामशाळा असे शारीरिक क्षमता जोपासण्याचे प्रकार असोत. . . त्यात आम्ही शरीर आणि मन दोन्ही दृष्ट्या जडत्वाकडे झुकणारे असल्यामुळे शारीरिक कष्ट जिथे होणार असतील त्यापासून अंमळ लांबच राहिलो ! माझी आई आणि माझा मित्र निखिल शाह- जे दोघेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सभासद होते- त्यांच्यामुळे मीही या गोष्टीत रस घेऊ लागलो . आणि हळूहळू हे काम आवडू लागलं. ते विचार पटू लागले. आणि या कामात मजाही येऊ लागली. आपण काहीतरी छान समाजोपयोगी काम करत आहोत, ज्यामुळे समाजात काहीतरी बदल होणार आहे अशी भावना त्यावेळी असे. .. . . 

आणि ही कामं होतीही तशी. . .  

बिबवेवाडीत तेव्हा एक 'चष्मे-उतारो बाबा' आला होता. अगदी पुण्यासारख्या शहरात राहून हा चष्मा आणि डोळ्यांचे विकार दूर करण्याचा दावा करे. समितीने त्याच्या विरोधात आंदोलन केले. आम्ही तो बिबवेवाडीत जिथे उतरला होता तिथे गेलो होतो- आधी आम्ही पेशंट असल्याचा बनाव करून. आणि नंतर उघडपणाने परंतु शांतपणे, कुठलीही दमदाटी न करता त्याच्याशी बोललो होतो. वर्तमानपत्रात या आंदोलनाला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि त्या बाबाला पळ काढावा लागला होता. . . . 

निर्मलादेवींच्या विरोधातील निदर्शनेही आठवतात . . . काय त्यांचा डामडौल ! त्यांचे परदेशी अनुयायी . . . त्यांचे ते सिंहासनावर एखाद्या राणी प्रमाणे बसणे ! निर्मलादेवींचे  एड्स पासून थेट कॅन्सर पर्यंत सर्व आजार कुंडलिनी जागृती मुळे पूर्ण बरे करण्याचे ते पोकळ दावे ! त्यांच्या भाषणातून त्यांनी अं.नि .स ला दिलेले धमकी वजा इशारे . . . आम्ही त्यांच्या त्या सार्वजनिक कुंडलिनी जागृतीच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. त्यांच्या त्या सर्व कवायती केल्या. . . पण खरं सांगतो, कुंडलिनी जागृती तर सोडाच, काहीही वेगळं वाटलं नाही. 

जनमताचा रेटा कसा असतो आणि त्यापुढे अं.नि .स ची ताकद किती तुटपुंजी असते याचाही अनुभव आम्ही वाकडला हनुमान जयंतीच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या एका अघोरी प्रथेच्या निमित्ताने घेतला होता. तेव्हा वाकड हे एक खेडं होतं . आतासारखं कॉन्क्रीटचं जंगल नव्हतं. तिथे एक प्रथा होती. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एका घराण्यातील एका पुरुषाच्या पाठीत लोखंडी आकडा घालून त्याला उंच खांबावर लटकावले जाई . (अजून हे चालते का हे माहित नाही) ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी समितीतर्फे आम्ही काही कार्यकर्ते (तेव्हाचे कार्याध्यक्ष डॉ. विद्याधर बोरकर यांच्यासह) गेलो होतो. या प्रथेविरोधात वर्तमानपत्रात खूप काही छापून आले होते. वातावरण तापले होते. आम्ही फार तर २०-२२ लोक असू आणि तिथे पंचक्रोशीतून हजारो माणसं जमली होती. तिथले सरपंच आले आणि आम्हांला त्यांनी शांत शब्दात पण स्पष्टपणे सांगितले की याला विरोध करू नये. आणि संख्येच्या जोरापुढे आमचे काही चालले नसतेच. तेव्हा आम्ही माघारी फ़िरलो. 

समिती मध्ये सहभागी होणारे बरेचसे तरुण आणि काही डॉ बोरकरांसारखे मध्यमवयीन तर माझी आई किंवा मिसेस प्रधान यांच्यासारखेही काही सभासद होते. पण निखिल शाह, शुभांगी शाह, शरद शाह, मिलिंद जोशी, मनोज जोशी, सुनित करंदीकर, उज्ज्वला परांजपे, प्रकाश घाटपांडे, मिलिंद देशमुख, तानाजी खिलारे, मंगला पराते, निलिमा भाले, माधव गोखले असा एक छान, उत्साही  ग्रुप होता. त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले. आणि मग या ग्रुपला भेटणे, चर्चा, गप्पा असे चालू झाले. मी सगळ्यात उशिरा आलो आणि तसे माझे काम फारच मर्यादित होते. म्हणजे अगदी गर्दी वाढविण्याएवढेच. . .  एकदा फक्त आम्ही पुणे ते सासवड असा सायकल प्रवास केला होता. वाटेत ४-५ गावी थांबून पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, गाणी असा कार्यक्रम होता. त्यात मी ग्रुप मध्ये - देवकीनंदन गोपाला या सिनेमातले संत गाडगेबाबा यांचे भारूड - ' घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला ' म्हटले होते. एवढाच काय तो माझा सक्रिय सहभाग होता. पण आत कुठे तरी या विचारांचा परिणाम होत होता जो अजूनही  टिकला आहे. 

आता विचार करता मला असे वाटते की  या सर्व काळातला परमोच्च क्षण कुठला असेल तर तो डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बरोबर शुभांगी/शरद शाह यांच्या घरी झालेल्या एका मीटिंगचा. . . किंबहुना मीटिंग काय झाली हेही मला आठवत नाही. पण आठवते ते त्यांचे अत्यंत साधे रूप, विचारांचा स्पष्टपणा आणि मुद्देसूद बोलणे. . कुठलाही अभिनिवेश नाही. . . शिवाय अतिशय फोकस असलेला विचार. . . त्यांचे व्यक्तिमत्व असे होते की आदर वाटायचाच पण ते accessible ही वाटायचे. या मीटिंग नंतर सहज गप्पा-गप्पांतून गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि डॉ. दाभोलकरांच्या उपस्थितीमध्ये अस्मादिकांना देखील गाण्याची संधी मिळाली ! ' तरूण आहे रात्र अजुनी', ' लाजून हासणे' ते 'सागरा प्राण तळमळला' पर्यंत गाणी झाली. ती त्यांनाही बहुदा आवडली असावीत. रात्री उशिरापर्यंत रंगलेली ही मैफल अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे !

Monday 22 July 2013

My take on ' Ship of Theseus'

  


(For all the Film makers, actors, script writers, Film critics on my timeline- please forgive my audacity of writing this 'review')

I won't say it is impossible, but it is certainly rare for all the film critics to unanimously & profusely appreciate a film. They would not do so without a reason. So indeed it was imperative for me to watch it- even if that meant sacrificing Sunday afternoon siesta, venturing out in rains, travelling from one end of the city to another & searching a parking place in the winding parking section of the mall where PVR cinema is located, buying 1st row tickets(only those were left!) at a little bit higher price (tickets for YJHD costed Rs. 230. This one was Rs.250) & above all risking wife's negative comments- "Where have you brought me & why?" But I am glad that all my risk paid off & all the efforts were indeed worth it.

Although I had read the basic story line of the movie, I would still say, I was unprepared for what unfolded in front of me. As an ordinary spectator, who is used to being fed by a Hindi movie, this was something different. You had to be actively involved & actually think during the movie. When was the last time that such a thing happened ? 'Being fed' is an important phrase here. As that's what we, as audience, are used to. I had actually liked 'Kahaani'. But Outlook's film critic- Namrata Joshi, I remember, had written that the director simplifies everything for the audience to make understand, leaving nothing for imagination.In that sense,   'Ship of Theseus' is like a classic book- to which you relate with as per your sensitivity, your disposition & your life experiences. There are no ready made answers like Navneet guides. Also, like a book, it doesn't leave you.. In fact it comes back to you time & again.

Each of the three stories is engaging. The idea of a visually challenged  person clicking photos & holding exhibitions for the blind in itself is amazing.I empathized more with the story of the monk-who on one hand fights a court case against the use of animals in drug trials as that amounts to violence & fights with a firm resolve to refuse any treatment for himself as that would have meant he was not walking the talk. But movingly & paradoxically , he succumbs this fight to his instinct to survive. That is also made possible because of a conflict /clash of ideas & thoughts that he has with a young lawyer- Charvaka. This guy comes up with such penetrating questions that even the monk is left speechless. For instance he asks the monk- how was his act of refusing to take medicine not equivalent to violence he was committing on himself & how was his choice not different from that of a suicide bomber who is so convinced about his political & religious thoughts.Being so used to gradual build up of a scene,air of anticipation & then dramatic dialogue delivery over the years( Remember- Deewar- Kya hai tumhare paas? or Sholay- Kitne aadmi thhe?) or being used to rhetorical questions like- Hum aapke hai kaun?, these type of confronting questions in SoT, simply come out of nowhere, at a very rapid pace catching you unawares. The third story of Navin- who has undergone renal transplant & one fine day is confronted with the possibility of he receiving the kidney via organ transplant racket. Pricked by his conscience, he wants to return his kidney- an absurd idea which takes him to try & deal with a problem which is actually not his. But he tries his best even if that means going  all the way to Stockholm & finding the recipient of 'stolen kidney'. Finally, he obviously can't retrieve that kidney & return it to its owner. But ironically, the donor too doesn't want it back. He is happy with lakhs of rupees deposited by the Swede in his bank! What I liked about this story is the way in which he earnestly narrates this to his grand mother saying he tried his best but nothing happened. To which she says- Itna hi hota hai! There is a fine humor in this story. And then the manner in which these stories are connected in the end is really wonderful.

The movie not just blew me away as spectator, but also as a doctor. The questions - is it possible for a 'life element'(if I may use such word)  from one person to get transferred to another? What changes take place in that person who receives such foreign part?-are really intriguing. This is of course no excuse, but being a  doctor from alternative medicine, I was not confronted with such questions. The film has brought to fore moral, ethical, philosophical, humane aspects of transplant in such an unassuming manner. There is no posturing, no pomp about it.

I heard that the writer & director Anand Gandhi is the same person who wrote episodes for the daily soap- ' ' Kyu ki saans bhi kabhi bahu thi.' If that is so, then this guy has evolved unbelievably. I would now certainly look forward to more such work from him.

After coming home, there were run of the mill movies - Sagar & Shaan on TV. In normal circumstances, I could have watched them over & over again. But now.. I was not interested. Does that graduate me to becoming an audience of a different type? I would like to say yes. But the fact is, I have a long way to go. But SoT has showed the way, that's for sure...

Saturday 6 July 2013

आज … तळजाईवर. . .



 
     Painted Francolin


आज खूप दिवसांनी तळजाई टेकडीवर गेलो. एखाद्या वारकऱ्याला जशी विठ्ठल भेटीची आस  लागते … अगदी तेवढ्या तीव्रतेने नाही तरी त्याच जातकुळीतील ओढ मला तळजाईकडे  घेऊन जाते. तिथे असं नेमकं काय आहे हे शब्दांत सांगणे अवघड आहे. पण मला वाटतं की शहरात राहूनही दाट झाडी, हिरवळ, विस्तीर्ण जागा आणि मुख्य म्हणजे इथले पक्षी यामुळे एका छोटेखानी जंगलात गेल्यासारखं वाटतं. आणि दरवेळी काहीतरी नवीन हाती लागतं ज्यामुळे इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. 



आज गेल्या गेल्या आमचं स्वागत पावश्याने त्याच्या ' पेरते व्हा ' ह्या signature call ने केलं. एकीकडे हा आवाज चालू असताना दुसरीकडून Painted Francolin ने जुगलबंदी चालू केली. यातच मध्ये मोरांची केकावली ऐकू येऊ लागली. तिकडे सातभाई यांचे "बायका किटी पार्टीत जशा गलका करून हसतात तसे " हसणे चालू झाले.( लोकहो ही उपमा मी दिलेली नाही तर ती  सुप्रसिद्ध पक्षी तज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी आमच्या पक्षी निरीक्षणाच्या सुरवातीच्या काळात आम्हांला सांगितलेली होती.) या आवाजात आणखी भर टाकली ती होल्याच्या आवाजाने! यातून एक वेगळीच सरमिसळ तयार झाली. शहरातील चित्रविचित्र आवाजांना, गोंगाटाला सरावलेल्या कानांना हा बदल छान वाटला. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की एक मोर सोडल्यास यातील कुठल्याही पक्ष्याचा आवाज सुमधुर नाही. आणि मोराचा तरी कुठे एवढा श्रवणीय call असतो ? पावशा आणि Francolin च्या आवाजाने तर सगळा परिसर दुमदुमून गेला. या जुगलबंदीत असं वेगळं काय होतं ?त्यांचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. त्यासाठी ह्या लिंकचा आधार घेतो…आधी Francolin चा आवाज ऐका आणि मग पावशाचा...




 

      पावशा ( Hawk Cuckoo )

मला वाटतं की यात एक  होती एक आश्वासकता… दर  वर्षी याच दिवसात त्यांचे इथे येणे आणि गाणे हे निसर्गचक्र अजूनतरी व्यवस्थित चालू असल्याचे लक्षण आहे. 

अशा 'तुका म्हणे होई मनाशी संवाद . . . आपुलाची वाद आपणांसी' अवस्थेची शक्यता असताना नेमकी ही स्थिती भंग पावते कारण कोणाच्यातरी मोबाईल वर जोरात गाणी लावलेली असतात.आणि तो फोन हातात घेऊन तो माणूस तुमच्या शेजारून जातो.       मी कितीही जरी गाण्यांचा शौकीन असलो तरी अशा वेळी मला ती अस्थानी वाटतात. एकतानता बिघडवणारी वाटतात. अर्थात आपण कोणाला काही बोलू शकत नाही किंवा ती गाणी ऐकण्यापासून थांबवू शकत नाही.मनात या पक्ष्यांच्या आवाजाची प्रतिमा साठवून परतीच्या वाटेला  लागलो. . . 

(सूज्ञांस सांगणे न लागे की हे फोटो अथवा व्हिडीओ माझे नाहीत. माझ्या लिखाणाला एक दृक-श्राव्य परिमाण देण्याचा तो एक छोटा प्रयत्न !)

Thursday 27 June 2013

R D Burman: One song.. different moods..

   

It's not easy to come out of the hang over of Madan Mohan songs just posted on 25th. But it would be nothing short of blasphemy if I miss RD's birth anniversary on 27th June! So what I would do is continue the same theme that I had for Madan Mohan- two versions of the same song...

RD too has many such songs as we all know so very well. It is not possible to post all of them. Here is a list of some of them-
1) Humein aur jeene ki chahat na hoti- Sung by Lata & Kishore from Agar tum na hote(1983) 

2) Yaad aa rahi hai- Lata, Amit Kumar as a duet & then solo by Amitkumar, from Love  Story (1981)  

3) Yaado ki baaraat -Lata & Kishore/Rafi-Yaado ki baaraat (1973) 
     
4) Mere naina saawan bhado -Lata & Kishore Mehbooba(1976)-There is an interesting story about this song which RD himself has talked about-the song based on Raag Shivranjani was first sung by Lata.. Kishore Kumar was apprehensive whether he would be able to render such a song based on classical music. So RD gave him the song recorded in Lata's voice. Kishore Kumar heard & practiced it & then sung it to perfection. It doesn't appear that he has rehearsed the song. Have a look.. Since I am given to biases for Lata Mangeshkar, I like Lata's version equally, if not more. Kya kare!
a) Kishore Kumar-


 b) Lata-

5) Humein tumse pyar kitna- Kishore Kumar & Parveen Sultana- Kudrat (1981)- It is a master stroke to use classical singer Parveen Sultana's voice for this Bhairavi & that too for Aruna Irani.

6) Tera mujhse hai pehle ka naata koi- Kishore Kumar & Sushma Shreshtha -Aa gale lag jaa (1973) 

7) Phoolo ka taaro ka sabka kehna hai- Lata/R D & Kishore Kumar- Hare Rama hare Krishna (1971)




8) One song but two male version is also a permutation available for the film Pyar ka Mausam(1969) - Tum bin jau kahan sung by Rafi & Kishore
a) Kishore Kumar 
b) Mohammad Rafi 

9) Then there is this song from Masoom(1981)-
a) Lata- 
b) Anup Ghoshal's version- Don't know why he didn't make it big in Hindi film music. If Shailendrasingh with flat voice could, then why couldn't this guy..He sings & then says a few lines in between very well-

10) Considering the ongoing rainy season- can this song be ever behind? Again, I like Lata's version too-from the film Manzil(1979)-
a) Kishore Kumar-


b) Lata- The way in which she sings la la la.. too good..




11) Saagar Kinare- Lata/Kishore as a duet & then solo by Lata- Saagar (1985)- As is known the roots of this song go back to Thandi hawayein(SD), then Madan Mohan song- Yehi hai tamanna, then Roshan- Rahe na rahe hum (Mamta)..
a) Lata/Kishore-
b) Lata-

12) Final Lata song is from one of the last films of RD- 1942 : A Love story (1994). I guess this is also by far the best song of Kumar Sanu..
a) Kumar Sanu-


b) Lata-



13) There are a few Asha Bhosale songs too & both are my favorites- first of them from Sanam Teri Kasam(1982)-Kitne bhi tu karle sitam
a) Kishore Kumar-


b) Asha Bhosale-



14) A beautiful song this from Sunny (1984)-Aur kya ehde-wafa hote hai 
a) Asha Bhosale-


b) Suresh Wadkar



As I said, this list is by no means comprehensive. Any additions are always welcome...


Tuesday 25 June 2013

Madan Mohan: Dil dhoondta hai...

Different situations in Hindi movies are associated with different songs. Obviously when the mood is happy & romantic,the songs are of that type.  And when there is a twist in the tale or a break-up or a judai or a deceit (bewafai) or an unforeseen calamity, then the same song is used to depict that mood. More often than not, the rhythm of the two types of songs is different- happy songs in fast rhythm & sad ones in a slow pace. The use of instruments also differs.Sometimes the lyrics change.. Sometime the lyrics are same but the change in tune & rhythm creates an entirely different impact. .

Madan Mohan in his many films has done this giving us some wonderful songs.. Posting some of them on his birth anniversary today (25th June) ..

1) The first one is from the film- Adalat (1958).. Here probably Nargis is yearning for Pradip Kumar(who has deceived her?) & that emotion is depicted through the slow rhythm & tune & importantly the lyrics- (tujhko garaj kya meri wafa se.. Jiyu ya maru mein teri balaa se)... But in the same song, the mood changes.. the song becomes a mujra.. Then you have sarangi & clarinet( reminiscent of  OPN) in fast rhythm. Lata Mangeshkar sings for Nargis & for mujra dancer Asha Bhosale lends her voice.



2) The second song is again from a Pradip Kumar starrer- Duniya na mane  (1959) - Here the happy song is a duet sung by Lata Mangeshkar & Mukesh- Tum chal rahe ho, hum chal rahe hai.. magar duniyawalo ke dil jal rahe hai..
And the sad version is rendered by Mukesh- with change in lyrics & also the tense of the song- Hum chal rahe the, wo chal rahe the.. magar duniyawalo ke dil jal rahe the.. Have a look-

b) Mukesh-


3) In the next film Ghazal (1964)- there are not one, not two but three versions of the same song- Interesting part is that happiest/ romantic version is in slow pace. This is the first time the hero meets the heroine. The song which depicts the feeling of deceit,hurt, pain & anger as the heroine marries another person has a fast tempo.Lyricist Sahir has penned the emotions so very well-
a) Lata- 

b) The second time, the hero presents the song in a mushaira where of course she is also there.. the song is in a different andaz..
Rafi- 



c) Rafi- 


4) And now we come to two of my favorites- the first one is from Mausam (1975) I could listen to this song forever & still never get tired of it..The connect is also with the lyrics- Dil dhoonta hai fir wohi.. fursat ke raat-din.. Here the lyrics don't change in both the moods.. But what wonders has Bhupindersingh's voice created in this song!
a) The start of this song is with Lata's superbly echoing prelude & then after the guitar piece, how well does Bhupinder pick up the song! 


5) And the last song is from film Chirag (1969) - Here probably the pace of the song doesn't change but still the two situations are different in the film. In Lata's version, heroine has lost her eyesight which has affected the hero quite a bit. And it is she who pacifies him with this song.. The lyrics change in the Lata's version..Previously, I used to like Rafi's version. But now I feel Lata's version gives a feeling difficult to describe- may be a quietness, serenity, peace.. sukoon.
a) Rafi- 



b) Lata- 


Friday 24 May 2013

Letter from a married man to a would-be married man !!!


Dear Ambarish (& Hemangi),
You would wonder why I have mentioned Hemangi’s name in bracket. But there is a definite reason-which you would come to know by the end of this letter…

When I came to know that you were going to get married on 30th May.. I wondered-Why on earth on 30th May? These days it is an in thing to get married on some fancy dates.. For example- 10/10/10 or 12/12/12 etc.So you could have easily chosen 11/12/13 as a date for your marriage. Or people prefer Valentine’s Day or any national holiday so that the marriage date is remembered not just by all others but by the couple as well ! But why 30/05/2013 ? Apparently, there is nothing unusual about this date… Then it struck to me that it happens to be the date of your grandparents-Tatyamama & Mami’s wedding… So you would want your marriage to be on that day..30th May is special also because it’s birthday of Manisha (your maushi) … 

 Oh.. & then it suddenly clicked.! It is also the day on which I got married to Vrinda ! So in one masterly stroke, you have put the ball in my court.. So now it becomes obligatory for me to share some of the lesser known secrets of my marriage..With 15 years of experience at my hand, here I am giving you some useful tips…You can call this a self-help guide.. Or this could be like Chetan Bhagat’s articles in TOI-which can fix any problem in the world so easily. Very soon I  too intend to write a best-selling book on this topic.

First & foremost- the shopping ! Wherever you decide to stay- whether in Mumbai, Coimbatore or any other place, there is always going to be some place like what we have in Pune- Tulshibag! Going to such places, I tell you from my experience, is nothing short of a punishment.(Except of course for the eye-catching beauties!) But you have job at your hand- you have to carry the shopping bags & that too in a crowd which is so busy in shopping that it doesn’t care if you are able to walk properly or not ! If you take my advice, try & find excuses to avoid going to such places- say that there is not enough place for parking, the police vans pounce upon your vehicle or something like that! This will not work for quite some time… You will have to go..But don’t lose patience! Avoid any stand-off  but still persist with your stand ! Once your resistance gets registered, a time will come ( der hai par andher nahi!) when either she will go herself for shopping all those womanly things or she will ask you to park your vehicle outside such shopping area & she will come back (hopefully) fast..

While we are still on shopping, let me tell you - set an example..How? Whenever you have to shop for yourself, take her along with you, go to a specific shop, ask for a specific colored shirt, make payment & leave.. All this in just 5 minutes ! You know what will this make? In words of famous Hindi cricket commentator, Sushil Doshi- it will build a mano- vaigyanik dabaav on her.. Now  the onus will be on her to shop with such a precision of a surgeon & also finish it fast ! This will also raise the bar- she will find it difficult but she will have to learn to speed up the things when it comes to shopping. You will save one topic of argument as your actions have already spoken louder than words ! 

And when you go with her in a mall for shopping (like D Mart), then I wish you all the very best ! I bet she will be lured & tempted not by exorbitantly priced  branded apparels or foot wear (thank God!)  but by discounts on Liberty oils, Bombino Sevai & Surf Excel! So you would end up buying 10 items which you had not thought of buying at the outset. Shopping in a mall could be a boring exercise. But while your wife is busy shopping, you could create your own image  ( for other wives to see, little bit enviously) of a very choosy, responsible & duty bound husband by scanning aimlessly the gehu or dal or picking randomly the biscuits which you are not going to buy.. After all, what matters is perception !

Now for some other important things in life than shopping (are there any?)…
Keep in mind one thing- there cannot be any argument when it comes to Pani-puri, Sugarcane juice, Vada-pav & Kanda Bhaji…. The most unhygienic roadside vendor will easily beat the choicest hotel in your city. Which simply means she will not have any problem after having eaten in such chaupatis & small food joints. But she might have GI upset after a dinner in a posh hotel! Why ? You cannot reason out ! In fact, the next tip is try & find out such points & issues which you can’t reason out & argue.. As the time goes on, you will find out that  this list will keep on growing !

Now sample this-
1   1) Favorite director- Yester years- Gurudutt Padukone. Current- Mahesh Manjrekar/ Madhur Bhandarkar.
2   2) Favorite actress- Yester years- Urmila Matondkar. Current- Deepika Padukone/ Amrita Rao
F   3) Favorite Cricket player- Yester years- Sunil Gavaskar. Current- (obviously) Sachin Tendulkar
4   4) Favorite Author- P L Deshpande, Ravindra Pinge
5   5) Favorite Poet- B.B. Borkar, Mangesh Padgaonkar
6   6) Favorite Hotel- Any Kamat

No… this is not some kind of a couples’ game where I am telling you how I know what my wife likes..  Take a closer look.. What do you find? There are many ‘kars’ in the list..( I suspect the reason why Vrinda said yes to me was probably because we are Pusal’kar’!)  But that’s not the main point..The point is all the people from the list are GSBs (Gaud Saraswat Brahmins) –the community that Vrinda belongs to ! So there is this natural tendency to have a bias towards them..So  any new movie of Mahesh Manjrekar is fit to be sent for Oscars…Sachin Tendulkar can do no wrong.. Madhur Bhandarkar’s films are the best thing to have happened to Bollywood… The bigger point is find out if your wife too has similar list.. You can score few brownie points by talking positive about the people in her list. In any case, avoid talking negative about them.Tread cautiously ! If there any negative markings in relationships, you would end up getting many such points !

Then there are some universal truths which can also be termed as cliches.. They hold true always.. One of them is that whenever there is an argument between you & your wife, there are only 2 possibilities- either she wins or you lose ! But even in this, I can give you some useful tip.. Always have some evidence with you.. This is an era of evidence based practice.. So keep the evidence handy.. It could be – On this & this day when we were discussing this… you had worn a black dress.. we were returning from a movie... it was raining… you had said that & now you are saying exactly the opposite! There is no guarantee that this will help you win, but what this could do is create some kind of confusion in her mind..She will be forced to look in to all the evidences rather than continue with her point ! That would help deflect the subject for a while. This is nothing short of a moral victory!

Well, I could go on & on.. but if I spill all the beans here, who will buy my book & read? How will it then be a best seller? I have given you some useful tips.. Now it is up to you to show the letter to Hemangi & share the secrets!That is why I have addressed her name in brackets.

Anyway, Congratulations to both of you & I am sure that both of you (with some help of my tips) are going to have a Happy Married life.

With love & best wishes,
-Rajesh Mama