Friday 26 December 2014

काश्मीर डायरी १०



खरं तर आजपर्यंत काही प्रवास केले. काही अभयारण्ये पाहिली. मोठी आणि सुंदर शहरे पाहिली. थंड हवेच्या ठिकाणीही गेलो. पण काश्मीरच्या बाबतीत जे घडलं (किंवा अजूनही घडतंय) असं या आधी कधीच झालं नव्हतं. कुठल्याही जुन्या हिंदी गाण्यात काश्मीर दिसलं की 'अरे! इथे आपण गेलो होतो.' आणि मग स्मरणरंजन चालू होत होतं ! काश्मीरबद्दलची कुठलीही बातमी जास्त इंटरेस्ट घेऊन वाचत होतो/पहात होतो. जणू एवढ्या लांबवर घडणारया बारीकशा गोष्टीचा आणि माझा खूप जवळचा संबंध होता! ही केवळ एक आत्मीयता नव्हती. फार क्वचित असं झालंय की एकदा एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यावरही पुन्हा पुन्हा तिथेच जाण्याची ओढ मनाला लागली आहे.'साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची' हे खरं तर प्रपंचाला मृगजळ समजणाऱ्या, प्रपंचाची ओढ न उरलेल्या वैरागी माणसाचे गाणे आहे. पण मला मात्र काश्मीरची हिमशिखरे जगण्यासाठी आणि या प्रपंचात राहण्यासाठी बळ देणारी वाटतात. 
काश्मीर मध्ये इतक्यात परत जाणे शक्य नाही. म्हणून या ब्लॉगच्या माध्यमातून ती हौस भागवून घेत आहे! काश्मीरवर लिहावं असं वाटलं होतं. पण ते इतकं लिहिलं जाईल असं मात्र मुळीच वाटलं नाही. म्हणूच नववा समारोपाचा ब्लॉग लिहूनही पुन्हा एकदा मी हजर आहे ! आम्ही मे महिन्यात काश्मीरला गेलो. तेव्हापासून आतापर्यंत तिथे काही ठळक घटना घडल्या किंवा काश्मीरसंबंधी मला गेल्या काही महिन्यात वाटलं त्याचा या ब्लॉग मध्ये आढावा ! 

मे महिन्यात आम्ही  तिथे गेलो होतो तेव्हा लोकसभा निवडणुकांचा एक टप्पा होता. बाकी आधीच झाल्या होत्या. ३० एप्रिलला  श्रीनगरला मतदान होते. तिथून फारुख  अब्दुल्ला उभे होते. एकूणच अब्दुल्ला घराणे आणि काँग्रेस यांच्याविषयी तीव्र नाराजी तिथल्या लोकांमध्ये असल्याचे जाणवले होते. म्हणून मला निकालाबद्दल उत्सुकता होती. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानही जास्त झाले होते. (आम्ही गुलमर्गहून  परत येत असताना एका मतदान केंद्रावर बॉम्बस्फोट झाल्याचे आम्हांला समजले होते. तरी त्या क्षेत्रातही  एकूण  मतदान बरे झाले) अपेक्षेप्रमाणे अब्दुल्ला आणि काँग्रेस या दोघांचा निवडणुकीत पूर्ण पाडाव झाला. अब्दुल्ला श्रीनगर मधून हरले. तिथे पीडीपीचा उमेदवार निवडून आला. ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्यातही पुन्हा ह्याच निकालांची पुनरावृत्ती होणार अशी चर्चा सुरू झाली. 

                                                                    *******

अशात सप्टेंबरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली. झेलम आणि चेनाब नद्यांना आलेल्या पुराने हाहा:कार माजला. अनेक जण  मृत्युमुखी पडले. पुराच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाची दृश्ये सर्व channels वर दाखवली जात होती. आणि ती अतिशय भयानक होती.न भूतो न भविष्यति अशा पुराची कारणमीमांसा करणारे काही लेखही वर्तमानपत्रात आले. अनिर्बंध बांधकामे, नियोजनाचा अभाव व त्यामुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि नैसर्गिक अशा ड्रेनेज व्यवस्थेवर मानवी अतिक्रमण अशी काही कारणं या पुरासाठी देण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी उत्तराखंड मध्येही अशाच कारणांमुळे पूर येउन अनेकांना प्राण गमवावे लागले होते आणि जबरदस्त हानीही झाली होती.
श्रीनगरला जिथे आम्ही चार दिवस होतो, ते हॉटेल अगदी दल लेक समोरच होते. मध्ये फक्त रस्ता -ज्याचे नाव बुलेवार्ड रोड! पण जी दृश्ये पाहत होत त्यात दिसत होते की हा सगळाच  भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. कित्येक ठिकाणी २-२ मजले पाणी  शिरले होते. दल लेक पूर्णपणे चिखलाच्या पाण्याचा दिसत होता. 

                                                      आम्ही पाहिलेले दल लेक चे हे विहंगम दृश्य....

आणि हे पुराचे भयावह दृश्य ! ....


 हे सगळं हेलावणारं होतं. आपण काहीतरी करावं असं सारखं वाटत होतं. पण इथे एवढ्या लांबून काय करू शकणार? निदान फोन करून काय परिस्थिती आहे हे तरी विचारावं असं वाटलं. डोळ्यासमोर श्रीनगरमधली आम्ही जिथे गेलो होतो ती सर्व ठिकाणं आणि तिथली माणसं आली. जिथे आम्ही राहिलो ते हॉटेल Brown  Palace, तिथला तो नाकी-डोळी आणि वर्णी पौराणिक सिनेमातला हिरो शोभणारा आणि वेळेचा पक्का पाबंद असलेला नझीर नावाचा वेटर आठवला. आमचा ड्रायव्हर शब्बीर, हाउस-बोट मधला इरफान आठवले. काय झालं असेल यांचं ? अस्वस्थपणे मिळतील ते सर्व नंबर फिरवले. अगदी जिथून त्या  पेपर माशेच्या वस्तू घेतल्या त्या दुकानदाराला केला तसेच Brown Palace, शब्बीर सगळ्यांना अनेक वेळा मी आणि माझा मेव्हणा सुनील याने फोन केले. पण संपर्क होऊ शकला नाही. नंबर लागतच नव्हते.शेवटी सैन्यदलातील माझ्या ओळखीचे मेजर यांच्याशी Whatsapp वर संपर्क प्रस्थापित झाला. त्यांची बदली कारगिलला झाली होती. तिथे अजिबातच काही अडचण नव्हती. त्यांचाकडून कळले की ज्यांनी आमची  उडीच्या सैनिकी पोस्टला दिलेली भेट आयोजित केली होती तेही 'सेफ' होते. हे समजल्यावर खूप बरं वाटलं. श्रीनगरमध्ये आम्ही जिथे केशर आणि बाकी बऱ्याच गोष्टींची खरेदी केली होती त्या मुदासीर यांचे दुकान दल लेकच्या अगदी समोर होते. त्यांच्याशीही मोठ्या मुश्किलीने Whatsapp वरच संपर्क होऊ शकला. मला आधी वाटलं होतं की ते ओळखतील की नाही किंवा त्यांना मी हे असे विचारणे आवडेल की नाही. पण तसं काही झालं नाही. मुदासीर हा दुकानाचा व्याप सांभाळण्याआधी एका न्यूज channelच्या मुंबई ऑफिस मध्ये प्रोडक्शन विभागात होते. तिशीतले,गोरेपान,गोबरया गालाचे  बोलायला एकदम गोड असे मुदासीर कामानिमित्त पुण्यालाही येउन गेले होते. त्यामुळे थोडंफार मराठीही बोलले होते. पुराच्या बाबतीत मी चौकशी केल्याचं त्यांना बरं वाटलं असावं. त्यांनी चक्क तिथले काही फोटो पाठवले. भूकंपानंतर जशी पडझड होते तशी अवस्था त्यांच्या दुकानाची झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५५-६० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. उमर अब्दुल्ला यांनी पूर परिस्थिती नीट  हाताळली नाही असा त्यांच्यावर आरोप होत होता. स्थानिक लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया दाखवल्या जात होत्या. त्याबद्दल मुदासीर यांना विचारलं असता त्यांनी सावध उत्तर दिलं. ते म्हणाले की सरकार, सैन्यदल जे काही करायचं ते करतायत पण इथे परिस्थिती एवढी बिकट आहे की अजूनही काही लोकांपर्यंत पुरेशी मदत पोचली नाही. म्हणून कदाचित त्यांचा संताप झाला असावा. ज्या प्रकारचं संकट होतं त्यामानाने मुदासीर अतिशय धीराचे आणि संयमी वाटले. 
आमच्या शब्बीर ड्रायव्हरशी  मात्र संपर्क होऊ शकला नाही. आणि आता फोन करण्यात फारसा काही अर्थ आहे असं वाटत नाही. 

                                                                          *******

ऑक्टोबरमध्ये काश्मीरची पार्श्वभूमी असलेला, शेक्सपियरच्या 'हॅमलेट' वर आधारित आणि बहुचर्चित 'हैदर' आम्ही पाहिला. वैयक्तिक स्वार्थ, लालसा आणि महत्त्वाकांक्षेसाठी एखादा धूर्त माणूस आजूबाजूच्या अशांत परिस्थितीचा कसा वापर करतो हा भाग सिनेमात चांगल्याप्रकारे दाखवलाय असं मला वाटलं. हा सिनेमा म्हणजे काश्मीर प्रश्नावरील डॉक्युमेंट्री आहे असा आविर्भाव दिग्दर्शकाने कधीच आणला नव्हता. त्यामुळे सर्व बाजूंना पूर्ण न्याय दिला गेला पाहिजे असं काही बंधन नव्हतं. तरीही सिनेमावर उलटसुलट चर्चा, गदारोळ सगळं काही झालंच. सिनेमात जे काश्मीर दाखवलं आहे आणि आम्ही जे पाहिलं ते खूप वेगळं आहे असं वाटलं. 'बिस्मिल' हे गाणं अवन्तीपुरा मंदिरात चित्रित करण्यात आलं आहे. ते ओळखीचं वाटलं. डाउन टाउन श्रीनगर आणि क्वचित दिसणारा दल लेक सोडल्यास सगळंच अपरिचित वाटलं. कदाचित बरंचसं चित्रीकरण थंडीतलं होतं(आणि आम्ही जवळ- जवळ उन्हाळ्यात गेलो होतो ) म्हणून असेल. शिवाय संपूर्ण सिनेमाला एक अशी ग्रे किनार वाटत होती जी आम्हांला अगदीच अपरिचित होती. सिनेमात कामं सगळ्यांचीच छान झाली आहेत. के के मेनन आणि श्रद्धा कपूर यांच्या बोलण्यातला काश्मिरी लहजा मला खूप आवडला. 
या सिनेमातील सुप्रसिद्ध 'बिस्मिल' गाण्याची लिंक देत आहे.  (हे  अवंतिपुरा मंदिराच्या आवारात चित्रित करण्यात आले आहे ) 

                                                                       ******* 
एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास झाला नसेल तर त्याच्या मनात एक वेडी आशा असते की जर परीक्षाच पुढे ढकलली गेली तर? उमर अब्दुल्ला यांच्या मनातही विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत असेच असावे. म्हणून त्यांनी पुराचे कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलता येतात का असा प्रयत्न करून पाहिला. पण तसे होणे शक्य नव्हते. प्रस्थापित सरकारविरोधी वातावरण आधीच होते. त्यात पुराने भर घातली. प्रत्येक टप्प्यात मतदानाचा आकडा उत्साहवर्धक होता. भाजपला रोखण्यासाठी का असेना पण जर लोकं मतदानासाठी बाहेर पडत होती तर ते एक सकारात्मक पाउल होते. त्यातच उडी येथील सैनिकी कॅम्पवर अतिरेक्यांनी हल्ला केला. टीव्ही वर जी दृश्ये दाखवली त्यावरून आम्हांला हे नेमकं कुठे घडलं असेल याचा अंदाज आला. उडीची भौगोलिक रचना आपल्यादृष्टीने कशी तोट्याची आहे हे मागे मी लिहिलं होतंच. त्याचाच प्रत्यय या घटनेत दिसून आला.लेफ्टनंट कर्नल या मोठ्या हुद्यावरील ऑफिसरसह आपले काही सैनिक यात मारले गेले हे खूपच दुर्दैवी होतं. २००४ मध्ये ही ते अशा हल्ल्यातून बचावले होते. या वेळी मात्र तसे होणे  नव्हते. 
लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक असे सहा-सात महिन्यात एक वर्तुळ पूर्ण झाले. नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली अजून सुरू आहेत. काही नवीन शक्यता निर्माण होऊन जम्मू काश्मीर मध्ये एक नवे पर्व सुरु होईल अशी आशा आहे. 

                                                                    *******



                                        


या मधल्या काळात काश्मीर वरील- 'Kashmir : Behind the Vale' हे एम जे अकबर लिखित आणि 'Curfewed Night' हे बशरत पीर लिखित अशी दोन पुस्तके आणली. सांगण्यास अतिशय लाज वाटते की माझी ती अजूनही वाचून झालेली नाहीत. झाल्यावर त्याविषयी कधीतरी लिहिन. . . . हे म्हणजे एखाद्या सिनेमाच्या शेवटी त्याच्या सिक्वेलची बीजं पेरतात तसं झालं ! पण तूर्तास इथेच थांबतो !

Monday 15 December 2014

Embark on a wonderful 'Happy Journey'

'Happy Journey' is such a well made film! It has almost all the elements of a good cinema- wonderful cinematography (& beautiful locations of Goa), crisp dialogues, humour bordering at times to being dead pan, brilliant performances & a director who seems to be firmly in the driver's seat! He has made a visually pleasing film. Gone are the days of Marathi films made on a shoestring budget. The director seems to have left no stone unturned to make this journey for the audience a visually satisfying experience. Kudos to Sachin Kundalkar for this pleasant fantasy film. It is certainly not easy to pull off such a genre so convincingly! 
This film belongs to Priya Bapat ! Agreed she has bagged the author backed role. But she has done wonders with it! Not just with her gorgeous looks & charm, but also with her live-wire performance, she is simply spellbinding!You cannot imagine any other actress in Marathi cinema who could have done justice to the role other than Priya Bapat. Missed out the title credits- but who is her dress designer? He/she also deserves a special mention! Atul Kulkarni slips in to the character to 'Niranjan' so very well ! He has a range of emotions to portray & he essays them wonderfully. This film is another feather in his cap. Also need to mention that I liked the way Pallavi Subhash speaks with a different accent for her role Alice. If only that accent had a tinge of Konkani! Other actors have also done well- Siddharth Menon, Suhita Thatte & Madhav Abhyankar. Chitra Palekar is another surprise package. Simply brilliant!
I am no film critic. But still there are a few points which I think need a mention-
1) According to me, perhaps apart from the song- ' Fresh' that jells well, they could have done away with the songs.
2) They could have ended the movie a little bit earlier. They had this wonderful visual- light at the end of the tunnel through which Niranjan & Alice go with a resolve to return home & they take a right turn.(pun intended for the word right!) It would have been such a wonderful sign-off note. That would have left something for the audience to imagine & still would have completed the story without leaving any hanging thread. I don't know if that would have also elevated the film a little bit more- the enjoyment is in the journey as well & not just in reaching the destination.. This might have come out of a compulsion to reach out to all types of viewers of the movie. For them things need to be simplified & served on a platter.
But that apart, do go & watch the film... An enjoyable experience!

Monday 1 December 2014

तीन कविता …२

कविता १  
ना फोन ना SMS 
ना फूल ना भेट...
घरीसुद्धा काहीच हालचाल दिसेना.
शेवटी घसा खाकरत मीच विषय काढला...
आज काय आहे माहितेय ना?
सारं कसं शांत शांत...
मग मलाच सांगावं लागलं...
तेव्हा majority मध्ये असणारया स्त्रियांपैकी दोघींनी मला Royal Ignore केलं..
बायकोनं जाता जाता तिला जमेल तेवढ्या तिरकसपणे विचारलं, " असं पण असतं का?"
मित्रहो, असा चालू झाला 

आमचा आजचा जागतिक पुरुष 'दीन'..नव्हे दिन!



___________________________________


कविता २

विरोधाभास

एक हात नाजुक

मऊ, लुसलुशीत. .फुलासारखा
तर एक हात थकलेला 
खरखरीत.कोमेजत्या फुलासारखा
एकीचे डोळे टपोरे,
हसरे
तर दुसरीचे
बारीक , भकास. 
दोघींना दात नाहीत 
पण एक हसते मनमुराद
आणि दुसरी हसणं विसरलीये.
दोघींना गरज आहे आधाराची
कारण एकीला सोडलंय 
तिच्या आई-वडिलांनी
तर दुसरीला
तिच्याच मुलांनी!
या मुलीपुढे आहे भविष्य 
पण तिच्यात दिसतो
मला माझा भूतकाळ
आठवते माझ्या मुलीचे
निरागस हसू!
आजींचे सरले आयुष्य 
त्यात मात्र दिसते 
मला माझे भविष्य ! 
_________________________

कविता ३


भीतीची भुतं 

कुठला तरी इंग्रजी चित्रपट पाहून 
घाबरलेली माझी लेक मला म्हणाली-
" मी आज तुझ्या शेजारी झोपते"
माझ्या कुशीत झोपली, माझा हात तिच्या अंगावर घेऊन !

बघता बघता गाढ झोपली. 
निश्चिंत. . निरागस !
मला तिच्या लहानपणीचा चेहरा आठवला.
 झोपेत नकळत हसणारा !

काय गंमत आहे !
तिला होती भुतांची भीती 
आणि माझ्या मनात होती 
असंख्य भीतीची भुतं !
आणि तरीही 

मी तिला तिचा आधार वाटत होतो !

Monday 17 November 2014

' एलिझाबेथ एकादशी' चं पारणं !



काल हा परेश मोकाशी दिग्दर्शित सिनेमा पाहिल्यावर माझी नेहमीप्रमाणे पहिली प्रतिक्रिया सिनिकल होती- छे ! असं कुठे असतं का? एवढं ' फील-गुड' दाखवतात का कधी ? वगैरे वगैरे … पण सिनेमा डोक्यातून जात नव्हता. तो ज्ञाना जसा पंढरपूरच्या छोटया-छोटया गल्ली- बोळातून सिनेमाभर फिरत असतो तसाच मी (मनातल्या मनात) त्याचे बोट धरून फिरलो आणि सिनेमाची एकीकडे उजळणी करता करताच दुसरीकडे या माझ्या  प्रौढत्व आणि सिनिसिझमच्या मुखवट्याआड, आत खोल खोल कुठे तरी कोपरयात दडून बसलेल्या माझ्यातल्या लहान मुलापर्यंत पोचलो. आणि मग मात्र मला सगळं आपसूकच पटू लागलं. तेव्हा माझ्या दृष्टीने या सिनेमाचं यश हे असं दुहेरी आहे- एक तर माझ्या सगळ्याच गोष्टींकडे नकारात्मक बघण्याच्या स्वभावाला थोडावेळ तरी मी बाजूला ठेवू शकलो आणि दुसरं मला माझ्यातलं लहान मूल (सिनेमा संपल्यानंतर का असेना पण ) दिसलं. 

या सिनेमाची गोष्ट सांगून मला वाचणाऱ्यांची सिनेमाबद्दलची गंमत घालवायची नाहीये. पण तरीही काही ठळक मुद्दे सांगावेसे वाटतात-
१) सिनेमात पहिल्यापासून ते शेवटपर्यंत काय जर असेल तर ती गोड निरागसता(हे पिवळं पितांबर सारखं होतंय का?) सर्वच मुलांच्या डोळ्यांतून, हसण्यातून, चेहऱ्यावरील हावभावातून, त्यांच्या बोलण्यातून, आणि त्यांच्या कृतीतून एक स्वाभाविक, त्या त्या वयाला साजेशी निरागसता दिसते. आणि या मुलांकडून तशा प्रकारे ती व्यक्त करायला लावण्यात दिग्दर्शकाचे कौशल्य आहे हे निर्विवाद !
२) सिनेमात काही गोष्टी खूप मार्मिकपणे दाखवल्या आहेत. केवळ सगळं गोड आणि सुंदर असं म्हटलं तर ते फार वरवरचं वर्णन होईल. त्यामुळे यातल्या काही facts चा ही उल्लेख करावासा वाटतो- 
अ) तसं बघायला गेलं  गोष्टीत जे काही घडतं ते ज्ञानाच्या आईला ५००० रू देऊन स्वेटरचे (बँकेने जप्त केलेले) मशीन सोडवता येत नाही म्हणून. बघायला गेलं तर ५००० रू ही रक्कम फार काही मोठी नाही असं वाटण्याची शक्यता आहे. हल्लीच्या मुलांना तर असं निश्चितच वाटू शकेल. कारण आपल्या शहरांमधील उच्च -मध्यमवर्गातील मुलांना ही रक्कम किरकोळ वाटू शकते. कपडे खरेदी -हॉटेलिंग -वीक-एंड ट्रिप्स आणि अशा इतर गोष्टींची सवय असणाऱ्या या मुलांना ५००० रू नाहीत म्हणून एखादे घर कोलमडू शकते किंवा या पैशांची जमवाजमव करताना किती अडचणी येऊ शकतात हे जाणवले तरी खूप झाले ! 
आ ) आणि अशी हलाखीची  परिस्थिती जरी असली तरी त्यावर हिमतीने मात करण्यासाठी झटणारी, मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तेवढी तजवीज करणारी, स्वाभिमानी आणि realistic आई दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी काही आया  अतिरंजित दाखवल्या जातात. त्या तुलनेत ही संयत आई (नंदिता धुरी यांचे अप्रतिम काम ) उठून दिसते. 
इ ) या मुलांमधील मैत्रीच्या आड कुठेही जात-पात, धर्म, आर्थिक स्थिती, आई-वडिलांचे व्यवसाय काही काही येत नाही. शाळेतला एक मुलगा 'वाईट वस्तीत राहतो ' म्हणून त्याला इंग्रजीचे पुस्तक द्यायचे नाही असली चलाखी ज्ञाना करत नाही. पुढे याच मुलाच्या खरी जाउन तिथली खाट घेऊन ही मुलं  दुकान थाटतात. वाईट वस्ती म्हणजे काय, त्या मुलाच्या आईचा व्यवसाय काय याबद्दलची त्या मुलांची चर्चा अफलातून ! 
ई ) टीव्ही आणि मोबाईल हे सध्याच्या मुलांचे 'मित्र' इथे जवळ जवळ नाहीतच ! नाही म्हणायला गण्याच्या मोबाईल वर त्याच्या वडिलांच्या नंबरसाठी रेड्याच्या आवाजाचा रिंगटोन धमाल उडवतो !
गण्याची भाषा शिवराळ असण्यामागे त्याच्या वडिलांची तशीच भाषा असते हे कारण आहे हे सोदाहरण पण विनोदी पद्धतीने छान दाखवलं आहे. तसाच 'या वेळची एकादशी खूप चांगली गेली' हे अनपेक्षितपणे एक वेश्या(ज्ञानाच्या मित्राची आई ) ज्ञानाच्या आईला सहजपणे सांगते.  हे वाक्य सिनेमातही इतकं सहज आणि पासिंग reference ने यावं असं आलंय की ते register ही होतं की नाही असं वाटतं. 
उ ) शहरातील आणि या सिनेमातल्या मुलांमधला आणखी एक फरक मला वाटला. तो म्हणजे सिनेमातली ही मुलं ज्ञानाचा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न, त्यासाठी उत्तर शोधणे आणि ते प्रत्यक्षात आणणे हे सगळं मनापासून, स्वत:ला झोकून देऊन करतात. एवढं सहजपणे मोठ्या शहरातील मुलं करतील असं वाटत नाही. 
ऊ) आणि म्हणूनच मला या सिनेमातले पंढरपूर हे ही एक महत्त्वाचे पात्र वाटते. ही गोष्ट अशा ठिकाणी घडू शकते- जे  अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. जिथे विठोबाचे अस्तित्व भक्तांना पावलोपावली जाणवते. अशा ठिकाणी प्रामाणिकपणा, खरेपणा, सचोटी, दुसऱ्याचा आणि त्याच्या परिस्थितीचा विचार(घरमालकीण यांच्याकडे  ६ महिने भाड्याचं नाव सुद्धा काढत नाही !) करणे हे सगळे होऊ शकते. 
मी काही सिनेमाचं परीक्षण करणारा समीक्षक नाही . त्यामुळे माझं मत कितपत ग्राह्य धरलं जाईल माहित नाही. पण एका निर्मळ, निखळ आनंदाच्या अनुभवासाठी हा सिनेमा जरूर बघावा असं मी नक्की म्हणेन ! 

Wednesday 12 November 2014

तीन कविता...१


१) भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियम वर एका भपकेबाज सोहळ्यात पदाची शपथ घेतली. त्यानिमित्त ही कविता- 

शपथविधी 

वानखेडे स्टेडियम जवळची 
लगबग पाहून एका सामान्य माणसाने 
तिथल्या वॉचमनला विचारले -
'इथे काय चाललंय हो?''
त्रासिकपणे वॉचमन म्हणाला -
' दिखता नहीं क्या ?'
'नितीन चंद्रकांत देसाईंचा दिसतोय सेट
आहे कसला इव्हेंट?'
झी गौरव ? की म टा सन्मान ?
नॉमिनेशन की मानांकन?
'अरे नया है क्या तू?
जानता नहीं ?
नया सी एम आ रहा है
शपथ ले रहा है'
' अहो पण तिथे शेतकरी
आत्महत्या करताहेत
दलित मारले जाताहेत
आणि इथे....'
'वो रोना धोना छोड रे
अब अच्छे दिन आए रे'
शपथविधीला कुणी धरतोय ठेका
उडवतोय टोप्या उधळतोय पैका
कारण शपथविधीच्या ब्रेक मध्ये
सुरु आहे लावणी
बावन्नखणी अहो बावन्नखणी
कशाचाच कशाला नाही मेळ
आहे फक्त पैशाचाच खेळ! 


( ३१ ऑक्टोबर २०१४ ) 
------------------------------------------------------

२) दिवाळी च्या आधीचे वातावरण टिपणारी ही कविता- 

आली दिवाळी


वर्तमानपत्राचं पहिलं पान बघेपर्यंत
जेव्हा सहा पानांच्या जाहिरातींचा अडथळा पार करावा लागतो
तेव्हा समजावे दिवाळी जवळ आली !
ज्वेलर्स ते बिल्डर्स
मॉल्स वा इलेक्ट्रॉनिक आयटम
ग्राहक राजाला भुलविणार्या
जाहिराती जेव्हा येऊ लागतात
तेव्हा समजावे
दिवाळी जवळ आली !

लोकांच्या नजरेतूनही कळतं
दिवाळी जवळ आली!
पोलिसांची ती 'शोधक 'नजर
पोस्ट मनची आशाळभूत तर
बायकांची शॉपिंग करतानाची भिरभिरती नजर सांगते
दिवाळी जवळ आली!
डॉक्टर कडची कमी होऊन
पिठाची गिरणी पासून ते टेलरपर्यंत
सगळीकडे गर्दी वाढली की समजावे
दिवाळी जवळ आली!
आणि हो!
आमच्यासारख्या कवड्यांच्या
कवितांचे पेव फुटू लागले
तरी समजावे
दिवाळी जवळ आली!

१२ ऑक्टोबर २०१४ ) 


३) आज पहाटे पुण्यात पाउस पडला.. अगदी थोडासाच... योगायोग पहा-इंटरनेट वर मुशाफिरी करताना कवी राजेश्वर यांची अशाच पावसाचे वर्णन करणारी कविता मिळाली. ती देत आहे-
असा कसा रे तू पावसा...
कुठलाही आवाज न करता
दबक्या पावलांनी आलास..
सवतीच्या घरी रात्र काढून
पहाटेच चोरट्यासारख्या परतणाऱ्या
एखाद्या पतीराजाप्रमाणे ?
तुझे हे असे येउन न येणे
चकवून जाणे ..
कोणालाच मान्य नाही.
बघ.. तुझ्याच थेंबांचे अश्रू ढाळून
झाडं मूक निषेध नोंदवतायेत.
(९ मे २०१२)

'मल्टी-पर्पज' डॉक्टर !




पूर्वी Reader's Digest या मासिकात 'All in a Day's work' या स्वरूपाचं सदर यायचं.
(आता ते सदर आहे की नाही माहित नाही) रोजच्या कामात घडणारे प्रासंगिक विनोद त्यात दिले जात. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि माझ्या रोजच्या  कामात काही मजेशीर प्रसंग घडत असतात . अगदी Reader's Digest मध्ये सांगतात त्याचप्रकारे ! अशाच काही  प्रसंगाविषयी सांगण्यासाठी हा लेख ! 
मात्र सुरुवातीलाच एक डिसक्लेमर देतो - विशेषतः हे लिखाण माझे काही पेशंट वाचण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी- हे जे काही मी लिहिलंय त्यातले पेशंट तुम्ही नाही. आणि तरीही तुम्हांला यात काही साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा आणि हलके घ्यावे. यातून कोणाला दुखवायचा अजिबात हेतू नाही.पेशंट खरं तर आजाराने, त्यांच्या आयुष्यातल्या समस्यांनी त्रस्त असतात. त्यांच्या आजाराला कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या दुखण्याची चेष्टा करण्याचा इथे हेतू नाही. परंतु नकळतपणे काही विसंगती घडत जातात आणि त्याची गंमत वाटते. म्हणून हे लिहावेसे वाटले. 

एक होमिओपॅथीचा डॉक्टर म्हणून जे काही कारणे अपेक्षित असते त्या व्यतिरिक्त इतरही काही छोट्या छोट्या भूमिका मी निभावत असतो. यात मी आणि दुसरे पात्र माझा दवाखाना असते. पेशंटच्या दृष्टीने माझा दवाखाना हा केवळ दवाखाना नसून आणखी बरंच काही असतो. यातून काही मजेशीर गोष्टी घडत असतात. उदा-
१) काहींना माझा दवाखाना हे मोफत वाचनालय वाटतं. वेटिंग रूम मध्ये ठेवलेली मासिके अत्यंत गंभीरपणे ते वाचत असतात. काही पेशंट तर आपले दवाखान्यातले काम झाले तरी बराच वेळ अंक वाचत बसतात. कोण म्हणतो की आपली वाचनाची आवड सध्या कमी झाली आहे? अर्थात याला मीही खत-पाणी घालत असतो. 'साधना', 'अनुभव', 'मिळून साऱ्या जणी' सारखी मराठी तर 'आउटलुक' किंवा 'The Caravan' सारखी इंग्रजी नियतकालिके दवाखान्यात वाचायला उपलब्ध असतात आणि तसे ताजेच अंक असतात. एकदा एक पेशंट आपल्या ५-६ वर्षांच्या मुलीला 'साधना' च्या मुखपृष्ठावरील चित्र दाखवून गोष्ट सांगितल्या सारखे बोलत होते-  "हे आजोबा कोण आहेत माहित आहे का? हे आहेत मोहन धारिया आजोबा ! तुला माहित आहे का.. यांनी किनई  खूप मोठं काम केलंय" ती मुलगी बिचारी काहीही न कळूनही कळल्यासारखी मान डोलवत होती. समाजवाद अजूनही इतक्या ग्रास रूट पातळीवर आहे हे पाहून मला अगदी भरून आलं. ते मला म्हणाले-"डॉक्टर हा अंक मी घरी घेऊन जाऊ का? हिला मी त्यांची सगळी गोष्ट सांगतो." चला ! म्हणजे पुढच्या पिढीत ही रुजणार समाजवाद ! एवढ्या प्रामाणिकपणे विचारल्यावर मी नाही कशाला म्हणतोय! इथे कितीतरी अंक असे न विचारता नेले जातात. आमच्या ओळखीच्या एक मावशी त्यांचे वाचून झाल्यावर मला 'अनुभव' आणि 'मिळून साऱ्या जणी' चे अंक देत असतात.त्या नेहमी मला म्हणतात- "हे घे राजेश, तुझ्या पेशंटनी पळवून नेण्यासाठीचे अंक!" काही पेशंट वेगळीच शक्कल लढवतात- आमच्या होमिओपॅथीविषयक दिवाळी अंक 'पर्याय' मधून बरोब्बर त्यांना उपयोगी वाटणारी पाने फाडून घेऊन जातात. अंक जागच्या जागी सुरक्षित! तेव्हा अशा पेशंटच्या तुलनेत हा पेशंट मला अदबीने विचारत होता तर मी नाही कसे म्हणणार ? आणि खरंच तो पेशंट समाजवादी असावा.कारण पुढच्याच आठवड्यात त्यांनी अंक चक्क परत केला! आणि वर म्हणाले-"इतर कोणाला वाचायला हवा  असेल तर उपयोगी पडेल!" 

२) नोटांचे विनिमय केंद्र- नाही ! मी काही डॉलरमध्ये फी आकारत नाही! इथे विनिमय या शब्दाचे  दोन अर्थ आहेत. पहिला म्हणजे डॉक्टरांच्या फीची अगदी फुटकळ रक्कम असली तरी त्यांना एकदम  २ हजाराची नोट द्यायची! वर हे ही सांगणारे/सांगणाऱ्या असतात -"पहिल्यांदा तुमच्याकडेच  आले. आता पैसे सुट्टे झाल्यावर पुढच्या खरेदीला जाणार!" म्हणजे आपण यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा करून द्यायचा ! दुसरा प्रकार म्हणजे फाटक्या, जीर्ण, चिकटपट्टी लावलेल्या, कुबट वास असलेल्या, रंगपंचमीचा /पानाचा लाल रंग लागलेल्या, थोडक्यात काय की इतरत्र कुठेही न खपू शकलेल्या नोटा डॉक्टरांकडे द्यायच्या. त्यांच्याकडे सहज खपतात! देताना ते इतक्या बेमालूमपणे देतात की आपल्याला थांगपत्ताही लागत नाही. काही वेळा असं वाटतं की आपण गाफील राहावं म्हणून फी देताना पेशंट उगाचच नाही नाही त्या विषयावर गूळ काढत बसतात आणि आपलं लक्ष नाही असं पाहून हातचलाखीने अशा नोटा खपवतात. 

३) मोफत दूरध्वनी केंद्र - हे आता मोबाईलच्या जमान्यात थोडं कमी झालं आहे. तरीही  क्वचित एखादा पेशंट म्हणतो- "डॉक्टरसाब, क्या मैं आपका फोन इस्तमाल कर सकता हूँ  ?मेरा फोन मैं घर पे भूल आया हूँ " आणि मग ते आपल्या बायकोशी फारसं काही महत्त्वाचं नसलेलं बोलण्यासाठी माझा लँडलाईन फोन वापरतात. (म्हणजे -आता मी इथे आहे… नंतर तिथे जाईन आणि मग घरी येईन... येताना कुठला मासा आणू .. वगैरे )

४) काही पेशंटना माझा  दवाखाना एक टप्पा वाटतो. म्हणजे कुठून कुठून खरेदी वगैरे करून यायचं आणि 'जरा विसावू या वळणावर ' तसं आपलं येता जाता दवाखान्यात यायचं! एकदा तर केटरिंगचा व्यवसाय असलेल्या एका पेशंटने माझ्या दवाखान्यात शेगडी, कढई, झारे असलं काय काय सामान आणलं आणि लटक्या अजीजीनं म्हणाल्या- "हे मी जरा इथे ठेवते. माझा भाऊ येऊन  घेऊन जाईल. आत्ता तो नेमका घरी नाहीये.सॉरी हं तुम्हांला थोडा त्रास देतेय." मी माफकपणे विरोध करत म्हटलं -" अहो पण ते लवकर घेऊन जातील ना ? नाहीतर लोकांचा गैरसमज व्हायचा की डॉक्टरांनी केटरिंगचा नवा जोडधंदा चालू केला की काय !" यावर त्या नुसत्या हसल्या आणि चक्क निघून गेल्या ! पुढे त्यांचा तो भाऊ येईपर्यंत माझा जीव मात्र  टांगणीला ! 

५) संकेत मीलनाचा -
पहिला फोन- "हॅलो आई, अगं मी डॉक्टर पुसाळकरांकडे आहे. येईन मी घरी इथलं झालं की !"
दुसरा फोन -"हॅलो... अमित ... अरे मी पुसाळकरांकडे आहे (फरक लक्षात घ्या- डॉक्टर शब्द गाळला आहे !) तू इकडेच ये … "
अच्छा ! म्हणजे माझ्याकडे येण्याच्या सबबीखाली काहीतरी वेगळंच शिजतंय! माझा दवाखाना हे असं भेटण्याचं ठिकाण होतंय ! अशा प्रकारे भेटून पुढे (त्याच मुलाशी) लग्न केलेल्या मुलीने कधी आत्मचरित्र लिहिलं तर कदाचित माझा त्यात कृतज्ञतेने उल्लेख होईल की- "घरून आमच्या प्रेमाला जेव्हा विरुद्ध होत होता तेव्हा डॉक्टर पुसाळकरांचा दवाखाना हा आम्हांला एकमेव आधार होता"- अशी आपली भाबडी आशा मला आहे ! 

पेशंटचीही काही खासियत असते. त्यांच्या काही सवयी असतात. मुख्य सवय म्हणजे डॉक्टरशी बोलताना उगीचच इंग्रजी शब्दांचा वापर करायचा . आता अस्मादिक मराठी आहेत हे आमच्या आडनावावरून सहज लक्षात यावे. त्यामुळे गरज नसताना कशाला इंग्रजी वापरावं? म्हणजे पेशंटनी अशक्तपणाला weaknessपणा म्हणणं, डोक्याला headache झालाय म्हणणं किंवा इन्सुलिनला इन्शुरन्स म्हणणं याचीही  आता सवय झाली आहे. पण त्याही पुढे जाणारे पेशंट असतात- एकदा असाच एक पेशंट पहिल्यांदाच आला आणि म्हणाला-" डॉक्टर, मला सर्दीचा त्रास आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून स्टेटमेंट घ्यायची आहे !" दोन क्षण मला कळलंच नाही. स्टेटमेंट द्यायला मी राजकीय नेता नाही वा तो पत्रकार नाही. किंवा जबानी द्यायला मी कुठला विटनेस नाही. मग लक्षात आलं. त्याला ट्रीटमेंट म्हणायचं होतं ! "हा...सर्दीसाठी तुम्हांला ट्रीटमेंट हवी आहे का?" 
"हो.. तेच ते... स्टेटमेंट !" (आपला हेका सोडायचा नाही!) 
'क्रोसीन'च्या गोळीला 'केरोसीन'ची गोळी म्हणणारे काही पेशंट पाहिले आहेत. पण एका पेशंटची सर कोणालाच येणार नाही असं इंग्रजी त्याने फाडलं ! मला म्हणाला- "डॉक्टर, मला external jealousy होतेय!" 
"काय?" " कुठे?" 
असं विचारल्यावर त्याने गळ्याचा भाग दाखवला. साहेबांना तिथे नायट्यासारखे फोड आले होते आणि तिथे खाज येत होती आणि आग होत होती. सरळ तसं सांगावं ना? जळजळ/ आग होणे यासाठी उगाच jealousy आणि बाहेरून त्रास होतो म्हणून external jealousy असं इंग्रजी भाषेला योगदान कशाला द्यायचं? 

होमिओपॅथिक डॉक्टरांना पेशंटच्या त्रासासंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतात. पेशंट त्या त्रासांचं जेवढं वर्णन करेल तेवढं आमच्या दृष्टीने औषध निवडण्याला मदतच होते. याचा काही वेळा पेशंट खूप वेगळाच अर्थ घेतात आणि आऊट ऑफ द वे जाऊन कुठल्याही गोष्टीचं(विचारलेलं नसतानाही) 'रसभरीत' वर्णन करतात. त्यांना वाटतं की ते डॉक्टरांना खूप काही मौलिक माहिती पुरवत आहेत! काही लोक  तर आणखी पुढे जातात. त्यांना एक  वरदान लाभलेलं असतं. क्लिनिक मध्ये येतात आणि  मोठ्या आवाजात हुकमी ढेकर देतात. क्लिनिकमधील काचा  अगदी दहीहंडी किंवा गणपतीच्या वेळच्या स्पीकरच्या भिंतींनी जशा हादरतात  किंवा व्हायब्रेट होतात तसंच काहीसं ! आणि मग हे शांतपणे म्हणतात- "डॉक्टर .. काहीतरी करा हो  तुम्ही ! .. अशा ढेकरा मला दिवसभर येतात! " म्हणजे आम्हांला न मागता लाईव्ह डेमो ! (तरी बरंय आणखी कशाचा डेमो नाही देत ते !)

होमिओपॅथीचे डॉक्टर फॅमिली डॉक्टरची भूमिका निभावत असतात. अलीकडच्या काळात कुटुंबाचा आकार लहान झालाय. त्यामुळे घरात वडीलधारी मंडळी कमी झालेली आहेत. लहान मुलांचे लाड जास्त आणि त्यांना शिस्त कमी अशी काही घरांमध्ये स्थिती असते. त्यामुळे आमच्यासारख्या डॉक्टरांकडे मुलांच्या आया घेऊन येतात. उद्देश आम्ही त्या मुलांना धाक दाखवावा हा असतो. पण त्यातून आमचं एक प्रकारे तक्रार निवारण केंद्र होतं. आणि बहुतांश आयांची एकच तक्रार- "डॉक्टर हा काही खातच नाही हो!" एक आई तर म्हणाली- "वॉचमन झाला, पोलीस झाला पण काही उपयोग नाही. शेवटी तुमच्याकडे घेऊन आले आहे. कोणाचं ऐकतच नाही. चांगलं मोठं इंजेक्शन द्या त्याला!" बाप रे ! म्हणजे पोलीस आणि वॉचमन यांच्या लाईनीत डॉक्टर ! आणि त्या मुलालाही माहित असतं या डॉक्टरकडे इंजेक्शन वगैरे काही नसतं ! फक्त गोड गोळ्या मिळतात. त्यामुळे तो एकदम चिल मध्ये असतो! काही आया म्हणतात- "अगदी घरभर फिरवतो हो खाण्यासाठी ! त्याच्या मागे मागे जाऊन भरवावं लागत!पार दमवतो तो मला !" पण कित्येकदा हे लक्षात आलेलं असतं की अशी मागे लागून भरवावं लागणारी मुलं चांगली गुटगुटीत असतात आणि आया देखील त्यांच्यामागे धावून अजिबात बारीक झालेल्या नसतात ! 
काही वेळा मात्र मुलांचं खाणं ही एक वरवरची समस्या असते. त्या मागचे काही वेगळेच धागेदोरे सापडतात. अशीच एका सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातली आई तिच्या आठवी- नववीतल्या मुलाला घेऊन आली होती. (बऱ्याच वेळा दिसतं की ही तक्रार सांगायला आईच येते.) तक्रार नेहमीचीच- मुलगा जेवत नाही. पालेभाज्या खात नाही वगैरे. तर अचानक मुलगा आईच्या वसकन अंगावर धावून गेला- 
"ए ... असं कुठे आहे? खातो मी हं भाज्या! तूच करत नाहीस पालेभाज्या तुला पित्त होतं म्हणून!" त्या मुलाचा आवेश, बोलण्याची पद्धत सेम टू सेम त्याच्या बाबांसारखी! त्यामुळे आई एकदम गप्पच ...तक्रार करायला ती आलेली असते पण इथे डाव तिच्यावरच उलटतो म्हणून खजील होऊन गप्प! अगदी अशीच ती नवऱ्यापुढेही गप्प होत असणार ! यांच्या घरी साधारण काय वातावरण असेल  याची एक छोटीशी झलक माझ्यासमोर सादर झाली. म्हणजे बाबा या व्यक्तिरेखेला दवाखान्यात येण्याचे कष्टही पडलेले नसतात.पण मुलाच्या रूपाने मात्र  ते हजर झालेले असतात ! आई तोंडघशी पडलेली असते, मुलाचा विजयी आविर्भाव झालेला असतो आणि आपण मात्र अवाक झालेलो असतो !

Friday 17 October 2014

Konkrete Poesie

     1) 

Ein Auto
Zwei Autos
Viel Autos
Verkehr
Verkehrverkehrverkehr
Luftverschmutzung.
Lärm.
Kein Auto
Keine Autos
Keine Luftverschmutzung.
Kein Lärm.

2)




3) 





Saturday 30 August 2014

Amrita Pritam

(This blog commemorates birth anniversary of noted Punjabi- Hindi Writer Amrita Pritam on 31st August)

It would be rather unfair if we just focus on the relationship shared between Amrita Pritam & Imroze with Sahir as the third angle. By doing so, we would be reducing their lives as nothing more than a gossip element. That would do injustice to the contributions all three of them made in their respective Art forms.

Talking personally, I came to know of this unique relationship quite late. My first introduction to Amrita Pritam was through this song- ' Ambar ki ek paak surahi ' from the movie 'Kadambari'. Sung by Asha Bhosale & music by Ustad Vilayat Khan, this song just lingers in the mind for its soulful tune. Yes, I must say that the tune & the music (the guitar pieces are amazing) was the reason that I liked the song first. Then of course was the way in which Asha Bhosale has rendered it. According to me, this song should always be included in the list of her top ten songs. Right from the initial alaap to the later harkats on baadal ka or later in the second stanza- apna isme kuchh bhi nahi hai, she is brilliant. The lyrics, speaking frankly, came very late in the picture. And I liked the word- kufr. The meaning of it is an act of blasphemy, but it really sounds so melodious!               
Here is the song-


But Amrita Pritam is known not just in this part of the world, but also across the border for her poem-Aaj aakhan Waris Shah nun. A poem that describes the scenario of Punjab after Partition of India & talks of plight of the Punjabi women who were confronted with the reality of killing of thousands & thousands of their near & dear ones. This poem was also included in a Pakistani movie made in 1961. The Sufi version of the poem is very touching & was included in the movie- Pinjar which was directed by Dr. Chandraprakash Dwiwedi. The movie is based on the novel of the same name written by Amrita Pritam. Here is the narration of poem by none other than Gulzar!
https://www.youtube.com/watch?v=rBvFabOMPVs


My third encounter with Amrita Pritam was through her autobiography- 'Rasidee Ticket' . I found the book very frank & courageously written. She has said whatever she had to, without any inhibitions. She comes across as a rebel, independent woman. This is the only Hindi book that I have ordered on Flipkart & perhaps also the only Hindi book that I have read in many many years. (Not that this is a very enviable record to flaunt!) Here are some of the excerpts from the autobiography -https://www.outlookindia.com/culture-society/book-excerpt-amrita-pritam-silent-love-for-sahir-ludhianvi-news-188629/amp

This is a beautiful poem that Amrita Pritam wrote for Imroze.Here is the link( The poor audio quality is regretted & whoever has recited it, has done it rather too dramatically!)
https://www.youtube.com/watch?v=V6yQk7ga8AM


तो एक चित्रकार . . . ती सुप्रसिद्ध लेखिका . . . . लौकिक अर्थाने त्यांनी लग्न केलं नाही पण त्यांचं सहजीवन तब्बल ४१ वर्षांचं होतं . . . एकमेकांना समृद्ध करणारं. . . इंदरजित उर्फ इमरोज आणि अमृता प्रीतम यांच्या या सहप्रवासात साहिर लुधियानवी नावाचं एक जबरदस्त वादळ येवून गेलं. . . पण दोघांनी एकमेकांना स्पेस दिल्यामुळे आणि दोघांचं एकमेकांवरचं प्रेम mature असल्यामुळे या वादळाचा त्यांच्या सहजीवनावर परिणाम झाला नाही. अमृता आणि साहिर यांच्यावर इमरोज यांनी किती निखळपणे लिहिले आहे-


संस्मरण

मुझे फिर मिलेगी अमृता
इमरोज़

कोई भी रिश्ता बाँधने से नहीं बँधता। प्रेम का मतलब होता है एक-दूसरे को पूरी तरह जानना, एक-दूसरे के जज़्बात की कद्र करना और एक-दूसरे के लिए फ़ना होने का जज़्बा रखना। अमृता और मेरे बीच यही रिश्ता रहा। पूरे 41 बरस तक हम साथ-साथ रहे। इस दौरान हमारे बीच कभी किसी तरह की कोई तकरार नहीं हुई। यहाँ तक कि किसी बात को लेकर हम कभी एक-दूसरे से नाराज़ भी नहीं हुए।

इसके पीछे एक ही वजह रही कि वह भी अपने आप में हर तरह से आज़ाद रही और मैं भी हर स्तर पर आज़ाद रहा। चूँकि हम दोनों कभी पति-पत्नी की तरह नहीं रहे, बल्कि दोस्त की तरह रहे, इसलिए हमारे बीच कभी किसी किस्म के इगो का खामोश टकराव भी नहीं हुआ। न तो मैं उसका मालिक था और न ही वह मेरी मालिक। वह अपना कमाती थी और अपनी मर्ज़ी से खर्च करती थीं। मैं भी अपना कमाता था और अपनी मर्ज़ी से खर्च करता था।

दरअसल, दोस्ती या प्रेम एक अहसास का नाम है। यह अहसास मुझमें और अमृता, दोनों में था, इसलिए हमारे बीच कभी यह लफ्ज़ भी नहीं आया कि आय लव यू। न तो मैंने कभी अमृता से कहा कि मैं तुम्हें प्यार करता हूँ और न ही अमृता ने कभी मुझसे। एक बार एक सज्जन हमारे घर आए। वे हाथ की रेखाएँ देखकर भविष्य बताते थे।

उन्होंने मेरा हाथ देखा और कहा कि तुम्हारे पास पैसा कभी नहीं टिकेगा क्यों कि तुम्हारे हाथ की रेखाएँ जगह-जगह टूटी-कटी हैं। उसने अमृता का हाथ देखकर कहा कि तुमको ज़िंदगी में कभी पैसे की कमी नहीं रहेगी। इस पर मैंने अमृता से उसका हाथ अपने हाथ में लेकर कहा कि ऐसा है, तो हम दोनों एक ही हाथ की रेखा से ही गुज़ारा कर लेंगे। हम दोनों हमेशा दोस्त की तरह रहे।

एक ही घर में, एक ही छत के नीचे रहे, फिर भी कभी एक कमरे में नहीं सोए क्यों कि मेरा और उसका काम करने का वक्त हमेशा अलग रहता था। मैं रात बारह-एक बजे तक काम करता और फिर सो जाता था। जबकि अमृता, बीमार पड़ने और बिस्तर पकड़ने के पहले तक, रात को आठ-नौ बजे तक सो जाती थी और देर रात एक-डेढ़ बजे उठकर अपना लिखने का काम शुरू करती थी, जो सुबह तक चलता रहता था।

हम दोनों ने जब साथ रहना शुरू किया, तब अमृता दो बच्चों की माँ बन चुकी थीं। हालाँकि, शुरुआती दौर में बच्चों ने हमारे साथ-साथ रहने को कबूल नहीं किया। लेकिन उन्हें एतराज़ करने की गुंजाइश भी नहीं मिली। क्यों कि न तो उन्होंने कभी हमें लड़ते-झगड़ते देखा था और न ही हमारे बीच कभी किसी किस्म का टकराव या मनमुटाव पनपते हुए महसूस किया था। धीरे-धीरे उन्होंने भी हमारा साथ रहना कबूल कर लिया। अमृता और मैंने शुरू में ही तय कर लिया था कि हम कोई बच्चा पैदा नहीं करेंगे क्यों कि उन्हें मिक्स अप होने में मुश्किल होगी। कई लोग ऐसा मानते हैं कि अमृता का तलाक़ मेरे कारण हुआ, लेकिन यह सच नहीं है। उसकी शादी तो भारत के बँटवारे के पहले ही हो गई थी। शादी के कुछ साल बाद ही उसे महसूस होने लगा कि जिस शख्स के साथ उसकी शादी हुई है, उसके साथ ज़िंदगी भर निभ नहीं सकेगी।

आख़िरकार उसने अपने पति का घर छोड़ दिया, लेकिन तलाक़ नहीं हुआ था। तलाक़ तो हमारे साथ-साथ रहना शुरू करने के कोई पंद्रह-सोलह साल बाद हुआ। जब हमने साथ-साथ रहने का फ़ैसला किया, तो हम दोनों के परिवार वालों को हैरत हुई और उन्होंने इस पर बड़ा एतराज़ भी किया। उनके एतराज़ की वजह थी अमृता का उम्र में मुझसे सात-आठ साल बड़ी होना और अमृता के दो बच्चे। चूँकि हम दोनों एक-दूसरे को जान-समझ चुके थे और हमने पक्के तौर पर साथ रहने का फ़ैसला कर लिया था, इसलिए किसी के एतराज़ का हमारे फ़ैसले पर कोई असर नहीं हुआ। दोनों ने यह भी तय किया था कि शादी जैसे किसी रस्मी बंधन में नहीं बँधेंगे। हमारे इस फ़ैसले का मेरे घर में सिर्फ़ मेरी दीदी ने ही समर्थन किया और जो लोग एतराज़ कर रहे थे, उनसे कहा कि ये कैसे खुश रहेंगे, इसका फ़ैसला जब खुद इन दोनों ने कर लिया है, तो किसी और को एतराज़ क्यों करना चाहिए!

अमृता के जीवन में एक छोटे अरसे के लिए साहिर लुधियानवी भी आए, लेकिन वह एक तरफ़ा मुहब्बत का मामला था। अमृता साहिर को चाहती थी, लेकिन साहिर फक्कड़ मिज़ाज था। अगर साहिर चाहता, तो अमृता उसे ही मिलती, लेकिन साहिर ने कभी इस बारे में संजीदगी दिखाई ही नहीं। एक बार अमृता ने हँस कर मुझसे कहा था कि अगर मुझे साहिर मिल जाता, तो फिर तू न मिल पाता।

इस पर मैंने कहा था कि मैं तो तुझे मिलता ही मिलता, भले ही तुझे साहिर के घर नमाज़ अदा करते हुए ढूँढ़ लेता। मैंने और अमृता ने 41 बरस तक साथ रहते हुए एक-दूसरे की प्रेजेंस एंजॉय की। हम दोनों ने खूबसूरत ज़िंदगी जी। दोनों में किसी को किसी से कोई शिकवा-शिकायत नहीं रहीं। मेरा तो कभी ईश्वर या पुनर्जन्म में भरोसा नहीं रहा, लेकिन अमृता का खूब रहा है और उसने मेरे लिए लिखी अपनी आख़िरी कविता में कहा है, मैं तुम्हें फिर मिलूँगी। अमृता की बात पर तो मैं भरोसा कर ही सकता हूँ।

अमृता के लिए इमरोज़ की कविता-

घोसला घर
अब ये घोसला घर चालीस साल का हो चुका है
तुम भी अब उड़ने की तैयारी में हो,
इस घोसला घर का तिनका-तिनका,
जैसे तुम्हारे आने पर सदा,
तुम्हारा स्वागत करता था,
वैसे ही इस उड़ान को,
इस जाने को भी,
इस घर का तिनका-तिनका
तुम्हें अलविदा कहेगा।
— इमरोज


Tuesday 15 July 2014

Kashmir Diary 9


Serenity 


It was second day of our stay at Pahalgam. We had a prolonged & perhaps inconclusive discussion on whether or not should we risk going for sight-seeing taking ponies.It was that part of Pahalgam  where no vehicles could go.So the only option was to take ponies. The overnight rains had made the slopes wet & slippery.  My nephew ' whatsapped ' his friend asking about the places we were to visit & was it really worth it. The answer was surprisingly NO. " All places were similar & no point on taking pony rides on skiddy slopes." That's what we were told. So we went to a small garden which was at a walking distance from our hotel. 

On our way to the garden, we were literally gheraoed by the guides who with their sweet language & skills, were trying to convince us. We found it difficult to say no to them, but at the same time our decision of not going was also not going to change. For the first time, we had no scheduled programme for the day & there was a question mark about how to spend the day. Perhaps at the back of mind, there was also a feeling that we were coming to the last leg of our trip. Just one day stay in the house boat & then we would be returning home! Back to the mundane routine ! The heart was heavy with a strange feeling of longing for more, although so far we had had a very enjoyable trip, to say the least! 

It was a cold but pleasant morning. It was slightly overcast, but there was no possibility of rains. The sun & clouds were playing hide & seek. The garden was located on the banks of river Lidder. After a look at the vast expanse of lush green lawns with a typical centrally located water canal & well maintained trees, we came towards the river bank. Here on the river bank, they had built a small view point, a hut like structure.   


                                                                                                       
Whoever thought have having it here, must be really a man of great insight & vision.A flowing river in the front, snow capped mountains on the opposite bank, mountains to our right & also behind & this garden was as if like the base of a bowl !
When the clouds dispersed, the blue sky appeared to be deeper blue. There was nobody in the garden apart from us. No other sound apart from the rhythmic flow of the river. And after a while, even this sound got completely merged in the spectacular imagery that we were now a part of.We just sat in that hut & soaked in the atmosphere. We did nothing else.
What we were experiencing was just like a small pause in the middle of a beautiful song. The pause only adds to the beauty of the song! Likewise our journey in to nothingness only added to the beauty of the trip. There was no hustle of visiting this or that place of tourist interest ! No cacophony of troublesome noises of all sorts!We were feeling Silence, looking at Silence, hearing Silence & also breathing Silence! We had a  liberty & luxury of being with ourselves. There was this Oneness between us & the Nature. It was here that we discovered the Paradise- the Peace of Mind! 

We could have easily spent the whole day like this. But we filled our minds with the everything that we could perceive through all the senses & with a contented mind, we left the garden. 

More than 2 months have gone by since our Kashmir trip. But this experience remains still fresh in my mind. In fact, I have kept a space in my heart wherein the above imagery has been permanently saved. This is a provision of sorts, as whenever my mind would be stressed or tired,I could keep going there, experience the Peace all over again & get refreshed to face the world !
                                                                                                    ( Photos by Smruti Pusalkar)

Friday 4 July 2014

Kashmir Diary 8


What is typical of Kashmir?

A stay of 8 days is not good enough to understand the peculiarities & the characteristics of a particular place. But while in Kashmir, we managed to catch a glimpse of many things that were either exclusive to Kashmir or there was a stamp of Kashmir on a few things found even otherwise. Though this may not be a comprehensive list, here is a description of some of them-

1) Clothing & accessories

a) Pheran: This is a traditional Kashmiri attire worn by people of all ages & both the sexes. It is a kind of long robe that gives protection from the harsh winter season. Usually made of wool or woollen material, they are 2 layered robes. The Pherans worn by women (naturally) have beautiful embroidery work made on them  while the men have rather simple, greyish, brownish or bluish coloured Pherans sometimes with chequered patterns. This photo of Shahid Kapoor from his upcoming film 'Haider' would give you a fair idea of what a Pheran looks like...



You can take your photos in traditional Kashmiri attire at almost all places of tourist interest. These photographers come to you at all places-even by shikara near your houseboat. You just have to wear the Pheran over your dress, wear the typical Kashmiri jewellery & you are ready to be clicked. 
                                      

b) I know nothing about embroidery but there is a distinct Kashmiri style of embroidery on ladies tops. My wife tells me that they use wool instead of thread & most of the work is chain stitch. You can find such tops displayed at all places-from Shrinagar to Pahalgam. We had been to a shop during our stay in the houseboat. This place is at the opposite bank of Nagin lake. Not a shop actually, but a huge bungalow ! They had all sorts of items-right from dress materials to Pherans to carpets to tapestry. You (especially those of fairer sex) would be forgiven if your probing vision is unable to settle on to one particular dress material here or a purse there or a Pheran or a carpet just across. Just sample a dress material & a top....

       
c) There were these embroidered  purses as well...



d) Tapestry : Our stay in houseboat was truly a majestic & royal experience. Actually the boat can accommodate 3 families. But fortunately for us, the third family didn't turn up. So we had the entire boat at our disposal. The soft, smooth & elegant Kashmiri carpets, the beautifully made wall hangings & also the hand made bedspreads! I really can't express the beauty in words...





 
All this apparently looks very simple but the finesse & finishing is quite extraordinary as if it is machine-made. Most of it is I guess, hand-made. Obviously, more the things hand made are, more is their price. We wondered why there is such a wide range of embroidery work to be found in Kashmir. The answer lies again in the harsh climatic conditions. During cold winters, when venturing out of house is impossible, people create such wonderful works of art while staying indoors. 

2) Shikara & Houseboat :

While we are talking about houseboat, this also quite peculiar of Kashmir. There are houseboats in Kerala as well. But I doubt if they are so tastefully decorated. We went to our houseboat from one bank of the Nagin lake to another through a Shikara-which is also unique to Kashmir. The houseboat in which we stayed was attached to ITC group. We were told that it takes about 2 1/2 to 3 years to build a houseboat. It costs somewhere in the range of 2-3 crores of Rs for it. Mostly made of Deodar & walnut-wood, the cost of maintenance is about Rs 5-6 lakhs every year & it involves mostly the polishing of the furniture. To tell you the truth, all the expenses really show as the houseboat that we were in, was very well maintained, imperial, splendid, magnificent & grand...We really rued that we stayed there only for a day. What if we could extend our holiday by one more day? That was obviously not going to be...


Intricate work on walnut wood 

The beautiful furniture not just on wall partition but also on ceiling, the Chandeliers, paper mache  vases, mammoth sofas.. everything was not just eye catching but eye pleasing!





    
                                                                                                  

To use the word of the present generation- our stay in Houseboat was really awesome   (But I can't spell the word as they do- owsum? or awsumz?... Whatever...!!!)

3) Bat Factory :

On Shrinagar-Pahalgam road, suddenly you start finding heaps & heaps of wood cut in the shape of bat, neatly piled one above the other in large space. These were cricket bat factories. Yes, Kashmir these days, is also renowned for a place where cricket bats are manufactured on a large scale. These are made of wood from the Willow tree- which is found in abundance in Pahalgam area.The wood has certain peculiarities because of which it is used to prepare bats. It is able to withstand weight & pressure. You can actually stand on it but it will not break. At the same time you can mould it to give proper shape. 


Willow tree

We visited one such factory- Metro factory- where we could actually see bats being made. The overall set up was more like a saw mill.


                                                                                          









Cricket is a game that is played in all nooks & corners of India. Kashmir too was no exception. But in one of our small arguments with driver Shabbir, he used the point very intelligently to drive home his point of alienation of Kashmiris from the rest of India . He said in all these IPL teams or in our national team, why was it that there was no inclusion of a Kashmiri player. We were at such a point of discussion  that it needed to be countered from our side. But then, alas! My so called & reputed strong Memory! I couldn't recollect the name of Parvez Rasool. I gave the name of Maharashtra Ranji player- Samad Fallah as an example.  Shabbir got confused, though not convinced.

4) Food & Drinks : 

We were not lucky enough to have got an opportunity to taste the traditional Kashmiri cuisine i.e. 36 course Wazwan mostly a feast of non-veg dishes made for ceremonies & celebrations. Most of these dishes are mutton based. We, for no particular reason, did not eat mutton there. We only had chicken dishes. Other typical Kashmiri dishes like Kashmiri dum aloo are commonly available. We tasted Kashmiri Rajma, which I thought is on the heavier side to digest. Of all the places in Kashmir, we had Kashmiri Pulav atop phase 1 at Gulmarg. 

 

In this photo, to your left is the Kashmiri Pulav while on the right (for the uninitiated) is Maggi noodles. I don't know if this Pulav that we had could be authentic or genuine because it had some dry fruits(mainly almonds) alright, but it also had Maggi masala! Surely they would not traditionally prepare Kashmiri Pulav adding Maggi masala to it! But there on the cool, snowy mountain amid rains, anything warm was welcome. We also had onion pakoras. 

Kashmiris are known tea drinkers & they have some different varieties & methods of preparing tea. One of the types of tea is called Kawa (or Kahwah or Kehwah or Qawah.. only a few variations of the same name!) This is a green tea mixed with sugar, saffron, cardamom & cinnamon, without milk & added with thinly cut almonds. Served warm, it is indeed an apt drink for the cold conditions over there. It was readily available at Gulmarg, both at the ticket queue & also at phase 1. It seems it is also served for the guests. Even if we go to shops, the owner could offer it to you. They say it is a health drink, energizing & helps to remain fresh throughout the day. You need to develop some taste for it as you don't easily digest the fact that your tea is going to be prepared using cinnamon!

Kashmiri Kawa Tea

While we are talking about saffron, it is indeed typical of Kashmir(though it is available in other places like Spain, USA etc). We could only see the vast saffron fields. The month of May is not the flowering season of saffron. It flowers in October.

Saffron fields 
Saffron flowers are purple colored & it is said that Kashmiri saffron is recognizable by its dark maroon-purple hue; it is among the world's darkest, which hints at strong flavour, aroma, and colouring effect. Just on a passing note, we have a Homeopathic medicine prepared from Saffron- Crocus sativus. In Shrinagar, we shopped from " the only recognized Saffron seller in Shrinagar" loads of Saffron-



5) Kashmiriyat :

Very often on news channel, we come across this term ' Kashmiriyat ', but I had not understood its meaning. The word seems to have a cultural, religious, traditional, artistic connotation in the context of Kashmir. In the present scenario, this might have changed to add some kind of nationalistic sentiment to it. What I take the meaning of the word is that it is a way of life of the Kashmiris. In any place where tourism is the main source of income, you come across so many tourist guides & drivers & hotel waiters etc. There was a common refrain in Kashmir from these people- "Hum yahan chori nahee karte. Hum chahe aapse jyada paise mange, lekin chori kabhi nahi karenge." This we experienced not once but twice & so we can safely say it must be true. When in Shrinagar, we had been to a hotel for lunch. It so happened that we changed our table & somehow our camera remained on the sofa at the earlier table. We had fulsome meal & left without realizing we had not taken our camera along. May be after an hour or so we suddenly realized it. Then we had this session of rewinding the events & incidences of where we had been & what all we did so that we could fix the spot where we might have left the camera. One of it was the hotel. It was only a matter of chance we thought. But that had to be taken. So we went there & to our pleasant surprise, the hotel owner had kept our camera safely in the drawer of his cash counter! Another experience is of a person whom we came to know in Gulmarg. He too had come from Pune along with the famous travel co. There are various small outlets where you get gumboots, warm clothes, gloves on rent. In one such shop, this person had forgotten his laptop bag. When we were putting on the shoes, we met him. The shop owner was returning him the bag. The bag had everything-laptop, mobile, camera. So indeed they might not be indulging in thefts in Kashmir(I am tempted to say excluding the politicians!) Another thing that we noticed is very few beggars on streets! Wherever you go you would really not find them. The only exception was the Hazrat Bal Durgah. Here we saw 2-3 beggars, but they were clearly not from Kashmir. This either means that J & K is a rich state or people believe in working & earning. And both of these could be true! 
                                                                                             
                                                                                                      (to be contd...)